परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन !

नवी देहली – भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी पुस्तकात दिलेल्या ‘रामायण’ महाकाव्याच्या संदर्भांवर खुलासा केला आणि श्रीराम, लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्याविषयीच्या प्रसंगांतून भारताच्या उदयाचे वर्णन केले. ‘विकसित भारताच्या उदयाचे ‘रामायण’ महाकाव्याशी साधर्म्य आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
सौजन्य : एएनआय न्यूज
१. एस्. जयशंकर म्हणाले की, भारताने जागतिक स्तरावर एका मोठा टप्पा गाठला आहे. या स्तरावर एकच कृती नाही, अशा अनेक कृती आहेत, जेथे आपला कस लागला. रामायण वाचले, तर आपल्या लक्षात येते की, अनेक प्रसंगांमध्ये श्रीरामाचा कस लागला; मात्र तो धनुष्यबाण घेऊन सज्ज झाला. भारतानेही अर्थशास्त्र, इतिहास, अणूऊर्जा, बांगलादेशची पुनर्रचना आदी क्षेत्रांत स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे.
We received the copy of the book WHY BHARAT MATTERS written by none other than our EAM @DrSJaishankar ji today.
The book looks enchanting with invaluable knowledge on the Indian foreign policy.
Words from the back cover ensure that it'd be a best-seller:
👉 India's quest to… pic.twitter.com/XXCh4o6RWQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 8, 2024
२. हनुमानाला स्वत:चे सामर्थ्य विसरण्याचा शाप मिळाला होता. नंतर त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव झाली. भारताच्या संदर्भातही असेच घडत आहे. काही वर्षांपूर्वी जे भारताला अशक्य किंवा अवास्तव वाटत होते ते, आज सहजरित्या होतांना दिसते.
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin