१. तोंडाला पावडर लावतांना ठेवलेला भाव
‘तोंडाला पावडर लावतांना ती पावडर नसून व्रजभूमीतील (वृंदावनातील) श्रीकृष्ण, राधा आणि गोपी यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली माती आहे’, या भावाने पावडर लावली जाते अन् मनामध्ये श्रीकृष्णाविषयीचा भाव जागृत होतो.
२. जेवणाची भांडी धुतांना ठेवलेला भाव
जेवणानंतर मी माझे ताट, वाट्या आणि पेले धुतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जेवण केलेली भांडी किंवा तिरुपती बालाजीला दाखवलेल्या नैवेद्याचे पात्र धूत आहे’, असे मला जाणवते आणि मन शांत होते.
३. भांडी धुण्यासाठी ठेवलेल्या प्रक्षालनपात्र(सिंक)विषयी ठेवलेला भाव
‘भांडी धुण्यासाठी पाण्याने भरून ठेवलेली ३ प्रक्षालनपात्रे (सिंक) म्हणजे, अनुक्रमे गोपीकुंड, राधाकुंड आणि श्यामकुंड असून, भांडी म्हणजे, माझे मन आहे. त्यामुळे तीन कुंडांमध्ये स्नान करून माझे मन शुद्ध आणि पवित्र होत आहे’, असे मला जाणवते अन् आनंद मिळतो.
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

साधकांना आधार देणारे आणि उत्तम नेतृत्वगुण असलेले ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. नागेश गाडे (वय ५० वर्षे) !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर केलेल्या उपायांमागील शास्त्र
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !