१. तोंडाला पावडर लावतांना ठेवलेला भाव
‘तोंडाला पावडर लावतांना ती पावडर नसून व्रजभूमीतील (वृंदावनातील) श्रीकृष्ण, राधा आणि गोपी यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली माती आहे’, या भावाने पावडर लावली जाते अन् मनामध्ये श्रीकृष्णाविषयीचा भाव जागृत होतो.
२. जेवणाची भांडी धुतांना ठेवलेला भाव
जेवणानंतर मी माझे ताट, वाट्या आणि पेले धुतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जेवण केलेली भांडी किंवा तिरुपती बालाजीला दाखवलेल्या नैवेद्याचे पात्र धूत आहे’, असे मला जाणवते आणि मन शांत होते.
३. भांडी धुण्यासाठी ठेवलेल्या प्रक्षालनपात्र(सिंक)विषयी ठेवलेला भाव
‘भांडी धुण्यासाठी पाण्याने भरून ठेवलेली ३ प्रक्षालनपात्रे (सिंक) म्हणजे, अनुक्रमे गोपीकुंड, राधाकुंड आणि श्यामकुंड असून, भांडी म्हणजे, माझे मन आहे. त्यामुळे तीन कुंडांमध्ये स्नान करून माझे मन शुद्ध आणि पवित्र होत आहे’, असे मला जाणवते अन् आनंद मिळतो.
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
वैराग्यस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
साधकांनो, सुदाम्याप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून साधनारत रहा आणि जीवनाचे सार्थक करून घ्या !