
मुंबई – भोंग्यांच्या प्रश्नाविषयी निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येईल. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही बोलवण्यात येणार आहे. भोंग्यांच्या प्रश्नाविषयी कुणी समाजाल वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. २ दिवसांपूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याविषयी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेतली. २ दिवसांत याविषयी नियमावली निश्चित होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक