पुणे – अभय योजनेद्वारे महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. ही योजना इतर महापालिकांनी राबवावी. तसेच पुण्यात डिसेंबरपर्यंत आणखी ५०० बसगाड्या धावतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शहराच्या विकासासाठीच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मला महापौर मोहोळ यांनी आमंत्रित केले होते, असे सांगून विकासकामांना गती देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. गेल्या ४ वर्षांत शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांसमवेत नुकतीच बैठक घेतली त्या वेळी ते बोलत होते.
फडणवीस यांनी सांगितले की, नदीपात्रातील सुशोभीकरणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. मुळा-मुठाच्या जायका प्रकल्पाचे काम जूनमध्ये चालू होईल. मेट्रोचा २१ कि.मी. टप्पा यावर्षी पूर्ण केला जाईल आणि दुसर्या टप्प्याला पुढील वर्षी निधी मिळेल.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
आर्थिक सक्षमतेसाठी प्रत्येक एस्.टी. आगाराचा स्वतंत्र विकास आराखडा करावा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
उष्णतेच्या लाटेमुळे वीज देयकांत वाढ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राज्यात बियाणांचे ३०० नमुने निकृष्ट
मोशी (पुणे) येथील दुर्घटनेच्या प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना तातडीने साहाय्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी घेतले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन !