पुणे – अभय योजनेद्वारे महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. ही योजना इतर महापालिकांनी राबवावी. तसेच पुण्यात डिसेंबरपर्यंत आणखी ५०० बसगाड्या धावतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शहराच्या विकासासाठीच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मला महापौर मोहोळ यांनी आमंत्रित केले होते, असे सांगून विकासकामांना गती देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. गेल्या ४ वर्षांत शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांसमवेत नुकतीच बैठक घेतली त्या वेळी ते बोलत होते.
फडणवीस यांनी सांगितले की, नदीपात्रातील सुशोभीकरणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. मुळा-मुठाच्या जायका प्रकल्पाचे काम जूनमध्ये चालू होईल. मेट्रोचा २१ कि.मी. टप्पा यावर्षी पूर्ण केला जाईल आणि दुसर्या टप्प्याला पुढील वर्षी निधी मिळेल.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर कर्जमाफीची घोषणा ! – मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘एअर इंडिया’ इमारत करारनाम्याचे हस्तांतरण !
मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘ई-बसगाड्यां’साठी चार्जिंग स्थानकाचे जाळे उभारा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस