पुणे – अभय योजनेद्वारे महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. ही योजना इतर महापालिकांनी राबवावी. तसेच पुण्यात डिसेंबरपर्यंत आणखी ५०० बसगाड्या धावतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शहराच्या विकासासाठीच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मला महापौर मोहोळ यांनी आमंत्रित केले होते, असे सांगून विकासकामांना गती देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. गेल्या ४ वर्षांत शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांसमवेत नुकतीच बैठक घेतली त्या वेळी ते बोलत होते.
फडणवीस यांनी सांगितले की, नदीपात्रातील सुशोभीकरणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. मुळा-मुठाच्या जायका प्रकल्पाचे काम जूनमध्ये चालू होईल. मेट्रोचा २१ कि.मी. टप्पा यावर्षी पूर्ण केला जाईल आणि दुसर्या टप्प्याला पुढील वर्षी निधी मिळेल.
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis
संवाद साधण्याला प्रयत्न; परंतु राजकारण केल्यास राजकीय उत्तर देऊ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘योग’ हा रामबाण उपाय ! – मुख्यमंत्री फडणवीस
संवाद साधण्याचा प्रयत्न; परंतु राजकारण केल्यास राजकीय उत्तर देऊ ! – मुख्यमंत्री