जवेली गावात पोचण्यासाठी मतदान पथकाला करावा लागला १३ कि.मी. पायी प्रवास !
निवडणूक तर झाली; पण उमेदवार निर्भयपणे तिथे कामे करू शकतील, याची निश्चिती आहे का ? नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी सरकार कधी पावले उचलणार ?

गडचिरोली – ‘नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील जवेली खुर्द ग्रामपंचायतीत ५७ वर्षानंतर प्रथमच निवडणूक पार पडली. या वेळी कुठलाही हिंसाचार न झाल्याने सर्व जण समाधान व्यक्त करत आहेत. नक्षलवाद्यांच्या प्रभावक्षेत्रात निवडणूक यशस्वीरित्या घेतल्याविषयी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन यांचे कौतुक केले आहे.
यापूर्वी सर्व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नक्षलवाद्यांनी उभे केलेले उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी नक्षलवादी मतदानकेंद्र असलेल्या गावाच्या सभोवताली होते; मात्र सुरक्षादल असल्यामुळे घातपात झाला नाही.
या वेळी पोलीसदल, सीमा सुरक्षादल यांच्या कडक बंदोबस्तात ९ मतदान पथकांचा चमू कन्हाळगाव बेसकॅम्प येथे हेलिकॉॅप्टरने आला. तेथून राज्य सीमेवरील जंगलातून सुमारे १३ कि.मी. पायी प्रवास करीत जवेली गावात पोचला. येथील तहसीलदार अजय नष्टे म्हणाले की, वर्ष १९६४ पासून या गावात निवडणूक झाली नव्हती. गावातील तरुणांनी निवडणुकीसाठी पुढाकार घेतला.
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी