
मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पहाता तूर्तास कुणालाही बेघर करणे योग्य नाही. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत राज्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिका, नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना दिला आहे.

दळणवळण बंदीच्या काळात याचिकाकर्ते सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मुदतवाढ २२ डिसेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली होती; मात्र सध्याची पार्श्वभूमी पहाता हा कालावधी ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. यासाठी काही ज्येष्ठ अधिवक्त्यांनी न्यायालयात याचिका केली होती.
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !