
कल्याण, १ डिसेंबर (वार्ता.) – येथील दुर्गाडी किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे मंदिर प्रदक्षिणा, तसेच मंदिराच्या आवारात फिरण्यासाठी निर्बंध घालण्यात आले होते. मंदिराला प्रदक्षिणा घालण्याच्या ठिकाणी बाकडे लावून ठेवण्यात आले होते, तसेच मंदिर परिसरात अधिक वेळ थांबू दिले जात नव्हते. त्यामुळे शासनाने मंदिरे चालू केली असली, तरी तेथे मोकळेपणाने फिरता येत नसल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाविषयी भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. कोरोनाचे नियम पाळून मंदिर प्रदक्षिणा लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !