राष्ट्रवादी काँग्रेसने माफी मागण्याची ‘गोवा सुरक्षा मंच’ची मागणी

वास्को, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – वास्को येथे हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे झेंडे लावल्याने चौकाचे विद्रूपीकरण करण्यात आले आहे. ‘आम्ही राष्ट्रवादी’ असा टेंभा मिरवायचा आणि राष्ट्ररक्षणासाठी ज्यांनी प्राणांचे बलीदान दिले त्यांना अपकीर्त करायचे हे योग्य नाही. या अक्षम्य चुकीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी ‘गोवा सुरक्षा मंच’चे युवा अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी केली आहे.
नितीन फळदेसाई पुढे म्हणाले, ‘‘हे स्मारक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्वजांचे नाही, तर ते देशाच्या सैनिकांचे आहे. त्यांचा मानसन्मान ठेवण्याचे दायित्व सर्वांचेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेससारख्या राष्ट्रीय राजकीय पक्षाने याचे भान ठेवणे आवश्यक होते.’’
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !