
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी
देवाचा वास ।
हे सुवचन ठाऊक आहे
बहुतेक सर्वांस ॥
परंतु कलियुगीची सांप्रतस्थिती
आहे वेगळी ।
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी
दिसतात ‘कोरोना’चे बळी ॥ १ ॥
कृपया अंतर्मुख होऊन विचार करा ।
आणि कटू सत्य हे सुविनये स्वीकारा ॥
पृथ्वीवरील देवदेवतांसह धर्मस्थळांंची केली विटंबना ।
तेथील प्रवेशाचे नियमही
पाळण्याची लाज वाटते धर्मद्रोह्यांना ॥ २ ॥
म्हणून आता मान खाली घालून
नियम पाळण्यास लावतो आहे ‘कोरोना’ ।
ही चपराक आहे निर्लज्ज आणि उन्मत्त या धर्मद्रोह्यांना ॥
नियम सारे पायदळी तुडवून यांना देवाला भेटण्याची घाई ।
‘कोरोना’ राक्षसाच्या भीतीने
नियम पाळण्याविना आता पर्याय नाही ॥ ३ ॥
दुचाकी-चारचाकी चालवणारा ज्या अर्थी कुणी आहे ।
त्या अर्थी या प्रचंड विश्वाचा चालक निश्चितच कुणीतरी आहे ॥
एवढे न्यूनतम भान ठेवा अन् शरण जा त्या विश्वचालकाला ।
अन् वाढवा ईशभक्तीची शक्ती,
जी नष्ट करील ‘कोरोना’ला ॥ ४ ॥
‘कोरोना’ महासंकट ठरो राष्ट्रीय इष्टापत्ती ।
हीच करतो सर्वांसाठी ईशचरणी नम्र विनंती ॥ ५ ॥
– आपला नम्र,
श्री. द.र. पटवर्धन, कोलगाव, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (३०.३.२०२०)
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !