ममता बॅनर्जी घायाळ झाल्याने निवडणुकीत दीड मास प्रचार करू शकणार नाहीत !

नंदीग्राम येथे प्रचार करत असतांना एका लहान अपघातात ममता बॅनर्जी यांच्या पायाचा अस्थीभंग झाल्याने पुढील दीड मास त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

(म्हणे) ‘गेल्या १ सहस्र २०० वर्षांपासून बंगालमध्ये गोहत्या होत असतांना ती कुणीही रोखू शकत नाही !’

बंगालचे धर्मांध मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी हे हेतूपुरस्सर असे वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. केंद्रसरकारने संपूर्ण देशात गोहत्याबंदी केली, तरच सिद्दीकुल्लाह यांच्यासारखे धर्मांध वठणीवर येतील !

तृणमूल काँग्रेसच्या धर्मांध नेत्याच्या समर्थकांकडून पक्षाच्या कार्यालयाची जाळपोळ !

तृणमूल काँग्रेसने दक्षिण २४ परगणामधील भानगर भागातील इच्छुक नेते अराबूल इस्लाम यांना विधानसभेच्या निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्याच कार्यालयाची जाळपोळ केली.

(म्हणे) ‘मत दिले नाही, तर पाणी आणि वीज मिळणार नाही !’  

बंगालमधील मंत्री अशा प्रकारची धमकी देतात, याचा अर्थ तेथे तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही आहे ! याविरोधात लोकशाहीचे तथाकथित पुरस्कर्ते असणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी पक्ष, संघटना, बुद्धीवादी तोंड उघडत नाहीत !

बंगालमधील बॉम्बस्फोटात भाजपचे ६ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ

बंगाल राज्याच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रामपूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांवर अज्ञातांनी केलेल्या बॉम्बच्या आक्रमणात ६ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ झाले आहेत.

तृणमूलचा विजय झाल्यास मौलाना आणि इमाम यांचे मानधन वाढवू !

तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम यांचे मशिदीमधून आश्‍वासन : हिंदु नेते कधी ‘पुरोहित, पुजारी यांना मानधन देऊ’ किंवा ‘असलेले मानधन वाढवू’, असे आश्‍वासन देत नाहीत; त्यांची मतपेढी नाही, हे लक्षात घेऊन हिंदूंनी त्यांची मतपेढी निर्माण करावी !

भारतीयत्वाच्या रक्षणार्थ सिद्ध व्हावे !

बहुसंख्यांक असलेल्या हिंदु समाजाचा विचार केल्यास आपल्याकडे #HinduLivesMatter या नावाने मोहिमा, आंदोलने, ऑनलाईन अभियान राबवावी लागतात. एकंदरीत, या तीनही राज्यांतील हिंदूंनी भारतीयत्वाच्या रक्षणार्थ स्वतःचे मत देणे, ही काळाची निकड आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसायला हवी, हेच खरे !

बंगालमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर तृणमूल काँग्रेसने गंगाजल शिंपडून केली मैदानाची ‘शुद्धी’ !

येथील मैदानात २२ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मैदानात जाऊन गंगाजल शिंपडून त्याचे ‘शुद्धीकरण’ केले. तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव यांच्या नेतृत्वाखाली हे शुद्धीकरण करण्यात आले.

बंगालमध्ये बॉम्बच्या आक्रमणात राज्यातील मंत्री झाकीर हुसेन घायाळ !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सरकारमधील मंत्रीही सुरक्षित नाहीत, यावरून तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उघड होते ! लोकशाहीत कार्यरत असे सरकार जनतेसाठी लज्जास्पदच !

हावडा (बंगाल) येथे श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या धर्मांधाला अटक

मशीद किंवा चर्च यांमध्ये तोडफोडीची घटना घडली असती, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि या घटनेतून हिंदूंना ‘तालिबानी’, ‘भगवे आतंकवादी’ ठरवण्यात आले असते; आता मात्र ‘सारे’ शांत आहेत !