(म्हणे) ‘हिंदु आणि मुसलमान मतांच्या विभाजनाला विरोध करणार !’ – ममता बॅनर्जी यांचे फुकाचे बोल

स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी हिंदू ममता(बानो) यांची कथित धर्मनिरपेक्षता ओळखून आहेत !

मुसलमानांना तृणमूल काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केल्यावरून ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाची नोटीस

मुसलमानांना संघटित होऊन तृणमूल काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केल्याच्या प्रकरणी निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

धर्मनिरपेक्ष लोकशाहीची थट्टा !

बंगालच्या राजकीय रणधुमाळीने किती खालचा स्तर गाठला आहे. ही लोकशाहीची थट्टाच असून जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करून नव्हे, तर धर्माधारित मते मागून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न होणे, हे पूर्णत: निषेधार्हच आहे.

बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे घायाळ झालेल्या भाजप कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू

काही आठवड्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते गोपाल मजुमदार यांच्या घरात घुसून त्यांची ८५ वर्षीय आई शोभा मजुमदार यांना मारहाण केली होती. तेव्हापासून त्या घायाळ होत्या. त्यांचे २९ मार्च या दिवशी निधन झाले.

बंगालमध्ये भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर आक्रमण

बंगालमध्ये निवडणूक चालू असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर निवडणूक शांततेच होईल का ? निवडणूक आयोगाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना आदेश दिला पाहिजे !

(म्हणे) ‘भारतातील ३० टक्के मुसलमान संघटित झाले, ४ नवीन पाकिस्तान बनतील !’

केंद्र सरकारने तात्काळ केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमांतून शेख आलम यांच्यावर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबावे, असेच हिंदूंना वाटते ! आलम यांच्या या विचारांच्या मागे कोणते षड्यंत्र आहे का, याचाही शोध घ्यावा.

भारतातील लोकप्रतिनिधींचे खरे स्वरूप जाणा !

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार तृणमूल काँग्रेसच्या आमदार ज्योत्स्ना मंडी यांची वर्ष २०१६ मध्ये असलेली १ लाख ९६ सहस्र रुपये इतकी संपत्ती वर्ष २०२१ मध्ये ४१ लाख रुपये झाली आहे.

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संपत्ती ५ वर्षांत १ लाखाहून थेट ४१ लाखांवर पोचली !

असा ‘चमत्कार’ भारतात राजकारण्यांच्या संदर्भात नेहमीच होत असतो आणि जनतेलाही ते अपेक्षित असते ! जर असे झाले नाही, तर ते आश्‍चर्यच ठरते ! असे ‘चमत्कार’ रोखण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था हवी !

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

देशात पुरो(अधो)गाम्यांच्या हत्या झाल्यावर देशातील सर्वच राजकीय पक्ष आवाज उठवतात; मात्र हिंदुत्वनिष्ठांच्या किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यावर कुणीही बोलत नाहीत, हा त्यांचा ढोंगीपणाच होय !