नृसिंहवाडीतील (जिल्हा कोल्हापूर) दत्त मंदिरात नियमांचे पालन करत भाविकांकडून दर्शन

मंदिर खुले झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्येही चैतन्यमय वातावरण पहावयास मिळाले.

अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनाने भाविकांना झाले भावाश्रू अनावर !

महाराष्ट्र शासनाने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे श्री स्वामी समर्थांचे मंदिरही १६ नोव्हेंबरपासून उघडण्यात आले.

कर्नाटकातील किष्किंधामध्ये हनुमानाची २१५ मीटर उंच मूर्ती स्थापन करण्यात येणार

कर्नाटकच्या जगप्रसिद्ध हम्पी येथील ‘हनुमद जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे प्रमुख स्वामी गोविंद आनंद सरस्वती यांनी कर्नाटकच्याच पम्पापूर किष्किंधा येथे भगवान हनुमानाची २१५ मीटर उंच मूर्ती लावण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी पहाटे ४ वाजल्यापासून भाविक रांगेत

तब्बल ८ मासांनी मंदिरे उघडल्याचा अपार उत्साह भाविकांमध्ये दिसून येत आहे.

प्रतिदिन ३ सहस्र भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन मिळणार ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

‘मंदिरे उघडल्यानंतर शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे भक्तांनी पालन करावे’, असे आवाहन आम्ही समितीच्या वतीने करत आहोत; कारण कोरोना महामारी अजून संपलेली नाही – हिंदु जनजागृती समिती

कोरोनाचे संकट असल्याने देवदर्शन घेतांना भाविकांनी काळजी घ्यावी ! – खासदार संजय राऊत

राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भाविकांसाठी दिवाळीच्या पाडव्यापासून म्हणजे १६ नोव्हेंबरपासून पुन्हा खुली करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. सरकारच्या मंदिर उघडण्याच्या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी ‘प्रार्थनास्थळांवर कोरोनाविषयाची पूर्ण काळजी भाविकांनी घ्यावी’, असे आवाहन केले आहे

मालवण येथे आज श्री देव रामेश्‍वर आणि श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा 

मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्‍वर यांच्या वार्षिक पालखी सोहळ्याला सोमवार, १६ नोव्हेंबर २०२० या दिवशी दुपारी १२ वाजता देऊळवाडा येथील श्री देव रामेश्‍वर मंदिर येथून प्रारंभ होणार आहे.

आझमगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

आझमगड जिल्ह्यातील शेखपुरा कबीरूद्दीनपूर या गावातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना ७ ऑगस्टच्या रात्री घडली.

हरिद्वार येथील ‘हर की पौडी’ येथे वीज कोसळून ८० फूट लांब भिंत कोसळली

हरिद्वार (उत्तराखंड) येथील ‘हर की पौडी’ गावातील ब्रह्मकुंडजवळ २१ जुलैच्या मध्यरात्रीनंतर वीज कोसळली. यामुळे ८० फूट लांबीची भिंत पडली; मात्र येथील मंदिर सुरक्षित राहिले.

शिर्डी संस्थानने मुदत ठेवींतून कर्मचार्‍यांचे वेतन दिले, तर तिरुपती देवस्थानही त्याच विचारात !

दळणवळण बंदीमुळे मंदिरांत अर्पण येणे बंद झाल्याचा परिणाम ! हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर सर्वच पैसा संबंधित सरकारे घेऊन जात असल्याने मंदिरांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आता धर्माभिमानी हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !