हिंदूंच्या सर्व समस्यांची नोंद विधानसभेत घेतली जाईल, अशा प्रकारची आंदोलने जिल्ह्यात करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

हिंदूंवर आघात करणार्‍या लव्ह जिहाद, हलाल जिहाद, वक्फ बोर्ड  धर्मांतरण आदी समस्या हिंदु धर्म आणि भारत देश यांच्या मुळावर उठल्या आहेत. या समस्या मुळापासून उखडून टाकण्यासाठी हिंदु संघटनांचे प्रभावी संघटन होणे आवश्यक आहे.

मुंबई विद्यापिठातील मुलींच्या वसतीगृहात ८ मासांपासून पाणीच नाही !

मुलींच्या वसतीगृहात पाण्याची कमतरता असेल, तर पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. (८ मासांनंतर असे निर्देश देणार्‍या विद्यापीठ प्रशासनाचा गलथान कारभार !)

गोवा : पर्वरी येथे क्रिकेटवर सट्टा खेळणार्‍या दलालांच्या टोळीला अटक

अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुतांश छत्तीसगड येथील २० वर्षे वयाच्या युवकांचा समावेश आहे. पोलिसांनी ३८ सहस्र रुपये रोख, ४७ भ्रमणभाष संच, १ लॅपटॉप, ३ टिव्ही, ३ राउटर, ३ टाटा स्काय टिव्ही प्रक्षेपण संच मिळून २५ लाखांचा ऐवज जप्त केला.

गोवा : टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरून काँग्रेसकडून जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांना घेराव

लोकांच्या आरोग्याशी खेळ ! गोव्यात पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाणारे टँकर मलनिस्सारणासाठी वापरले जातात. त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका उत्पन्न होत आहे, अशी भूमिका घेऊन काँग्रेसचा जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्याना घेराव !

न्यायालयाच्या निर्णयामुळे गोवा राज्यात खाणी चालू होण्यास विलंब होणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

उच्च न्यायालयाने एप्रिल २०१८ मध्ये केंद्र सरकारने पर्यावरण संमती रहित केलेल्या खाणींचा आता ई-लिलाव जिंकणार्‍या आस्थापनांना नव्याने पर्यावरण दाखले प्राप्त करावे लागतील. त्यासाठी खाण आस्थापनांना पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन करावे लागेल.

धर्मादाय रुग्‍णालयांतील गरिबांसाठीच्‍या राखीव खाटांची माहिती ‘अ‍ॅप’द्वारे मिळणार !

धर्मादाय रुग्‍णालयांमध्‍ये निर्धन आणि आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्‍या जागांपैकी किती खाटा शिल्लक आहेत ?यासाठीचा ‘अ‍ॅप’ प्राधान्‍यक्रमाने सिद्ध करण्‍याचा आदेश आरोग्‍यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी प्रशासनाला दिला आहे.

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३२.३७ टक्के मतदान

या निवडणुकीत ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघातून १ सहस्र ६२१, तर ग्रामपंचायत मतदार संघातून १ सहस्र ७९४ मतदारांनी मतदान केले.

१ मे पासून ‘शिर्डी बंद’ची हाक !

न्यायालयाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने केंद्रीय सुरक्षा देण्यास सिद्धता दर्शवली आहे. यामुळे ग्रामस्थांनी या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने निधी जमावण्यासाठी ग्रामस्थांनी भिक्षा झोळी आंदोलनही केले होते.

बारसू येथील प्रकल्पाला ७०  टक्क्यांहून अधिक लोकांचे समर्थन ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आंदोलन करणारे काही लोक स्थानिक, तर काही बाहेरचे होते. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पाच्या कामासाठी बळजोरी केली जाणार नाही. प्रकल्पामुळे नागरिकांना रोजगार मिळेल.

इतिहासात प्रथमच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्‍वरहून १ दिवस आधी प्रस्थान होणार !

प्रतिवर्षी चतुर्दशीच्या दिवशी पालखीचे होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला, म्हणजेच २ जूनला होणार ! २८ जून या दिवशी पालखी पंढरपूरला पोचेल. ३ जुलै या दिवशी परतीचा प्रवास चालू होऊन २० जुलै या दिवशी पालखीचे त्र्यंबकेश्‍वर येथे आगमन होईल.