प्रजासत्ताकदिनी हिंदु प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शौर्य जागरण शिबिरा’मध्ये ते बोलत होते. या व्याख्यानाला पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अकलूज, मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतून पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते.

घाटंजी (जिल्हा यवतमाळ) येथील आरोग्य केंद्रात पोलिओ डोसऐवजी १२ बालकांना सॅनिटायझर पाजले !

आरोग्याच्या संदर्भात एवढा हलगर्जीपणा करणार्‍यांना वैद्यकीय सेवक म्हणता येईल काय ? बालकांच्या जिवाशी खेळणार्‍या आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल !

ख्रिस्ती गायक फ्रान्सीस द तुये यांच्या वतीने वादग्रस्त ‘सांकवाळे अयोध्या कोत्ता ?’ हे कोकणी गीत रचून ते यू ट्यूबवर प्रसारित करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न !

शासन याची नोंद घेत नाही आणि पुरातत्व विभागही ख्रिस्त्यांच्या दबावाखाली या वारसास्थळी त्यांचे अतिक्रमण खपवून घेतो, हे हिंदूंसाठी दुर्दैवी आहे !

(म्हणे) ‘एल्गार’ ही अवैध नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही !’- अरुंधती रॉय

ज्या परिषदेच्या आयोजित ठिकाणी कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या १९ संशयित आरोपींचे ‘पोस्टर’ लावण्यात येते, ती परिषद अवैध नाही, असे म्हणता येईल का ?

पितांबरी आस्थापनाच्या वतीने ‘पितांबरीचं फिरतं दुकान’ या अभिनव उपक्रमास प्रारंभ !

‘पितांबरी’च्या १६५ वेगवेगळ्या पॅकिंगमधील ८२ हून अधिक अभिनव आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांचा अधिकाधिक लोकांना लाभ घेता यावा, यासाठी ‘पितांबरी’चं फिरतं दुकान’ असा अभिनव उपक्रम पितांबरीने चालू केला आहे.

प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

प.पू. राऊळ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या पुण्यतिथी उत्सव सोहळ्यानिमित्त झालेल्या अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि तीर्थप्रसाद अन् अखंड महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला.

कॅसिनोंमुळे राज्यशासनाला मागील ९ वर्षांत १ सहस्र २२७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

कॅसिनोंमुळे राज्यशासनाच्या तिजोरीत १ सहस्र २२७ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. तरंगत्या कॅसिनोंमुळे ७८५ कोटी ५२ लाख रुपये, तर भूमीवरील कॅसिनोंमुळे ४९१ कोटी ७६ लाख रुपये राज्यशासनाला मिळाले.

हिंगोली जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के !

जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तालुक्यांमध्ये ३० जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची ३.२ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे.

रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापुरातील शिवम सहकारी बँकेचा परवाना रहित

भारतीय रिझर्व्ह बँकेने शहरातील शिवम सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रहित केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने बँकेने ही कारवाई केली आहे. या बँकेतील ९९ टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना ठेवीवर विमा संरक्षण आहे.

अतिक्रमितांना मोफत घराची बक्षिसी देणारे चित्र केवळ महाराष्ट्रात पहायला मिळते ! – उच्च न्यायालय

अतिक्रमण होऊ नये यासाठी कायदे करूनही त्याची कार्यवाही न करणार्‍या उत्तरदायी अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली, तरच अतिक्रमण करण्याचे कोणी धैर्य करणार नाही !