पुणे येथे घरफोड्या करणार्‍या मुंबईच्या २ धर्मांधांना मुंबई येथून अटक !

धर्मांधांची गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलीस कोणत्या उपाययोजना करणार ?
अल्पसंख्यांक म्हणून सरकार अनेक सोयी-सवलती देते, तरी गुन्ह्यांमध्ये त्यांचाच सहभाग अधिक असतो.

पुणे येथे मेट्रो स्थानकांना आस्थापनांची नावे देण्याच्या क्लृप्तीमुळे कोट्यवधींची कमाई !

मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ही आस्थापने आणि संस्था यांची नावे दर्शनी भागामध्ये विज्ञापनांप्रमाणे देण्यात येतात.

विनापरवाना वाहन चालवणार्‍या अल्पवयीन मुलांच्या पालकांविरोधात गुन्हा नोंद !

पालकांच्या विरोधात मोटार वाहन कायदा १८८ चे कलम ३, ५, १९९ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. विनापरवाना वाहन चालवणार्‍या अल्पवयीन मुलांच्या पालकांना मोटर वाहन कायद्यान्वये ३ वर्षे शिक्षा आणि २५ सहस्र रुपये दंडाची तरतूद आहे.

भविष्यात कार्बनमुक्त आणि अपघातविरहित वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर देणार ! – डॉ. रेजी मथाई

‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडिया’ आणि ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील भविष्यात येणार्‍या नवप्रवाहांवर विचारमंथन करण्यासाठी ‘ऑटोमोटिव्ह फ्युचर ट्रेंड्स’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

औंध (पुणे) जिल्हा रुग्णालयातील २ परिचारिका दोषी आढळल्याने निलंबित !

औंध जिल्हा रुग्णालयातील २ परिचारिका रुग्णांना चुकीच्या रक्तगटाचे रक्त संक्रमण केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांना निलंबित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याची नोंद घेत ..

तळेगाव (जिल्हा पुणे) रेल्वेस्थानक परिसरातील स्मशानभूमी २ वर्षांपासून बंद !

अत्यंत महत्त्वाच्या सुविधेपासून जनता दोन वर्षे वंचित असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! असे असंवेदनशील प्रशासकीय अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत !

पिंपरी (पुणे) येथील पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पात्रात राडारोडा टाकणार्‍यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई !

एकदा कारवाई करून न थांबता पुढेही अशा प्रकारची कृती कुणी करणार नाही, यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ‘शिवसृष्टी’तून सर्वांना समजेल ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

छत्रपतींनी शेती, व्यापार, स्वधर्म, स्वभाषा या गोष्टींचा विचार केला होता, असे प्रतिपादन ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ५६ टी.एम्.सी. पाणीसाठा !

जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून २७ मार्च या दिवसापर्यंत ५६.३९  टी.एम्.सी. एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा केवळ २ महिने पुरेल इतकाच आहे.

पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या जंगलामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढले

वणवा लावणार्‍या अशा विकृत प्रवृत्तींना कठोर शिक्षा होणे आवश्यक !