राज्यातील आपत्तींचे व्यवस्थापन पहाणारा मंत्रालयातील विभागच आपत्तीमध्ये !

मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षामधीलही अनेक पदे रिक्त आहेत. मंत्रालयीन नियंत्रण कक्ष आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांतील रिक्त पदे भरण्याची मागणी या विभागांकडून करण्यात आली आहे; मात्र राज्य सरकारकडून त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही.

वर्ष २०२५ मध्ये येणार्‍या सौर वादळामुळे जगभरातील इंटरनेटची संपूर्ण यंत्रणाच नष्ट होण्याची शक्यता !

या प्रकाराला ‘इंटरनेट अ‍ॅपोकॅलिप्स’ अशा संज्ञेने संबोधिले गेले आहे.

राजधानी संकटात !

‘निसर्गाने साथ द्यावी’, असे वाटत असेल, तर धर्माचरणाचा मार्ग अवलंबण्यातच हित आहे, हे मनुष्याने लक्षात घ्यावे !

१७-१८ जुलैला रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट  

मुंबईसह किनारपट्टीच्या अनेक भागांत जोरदार पाऊस चालू झाला आहे. खेड येथील जगबुडी नदीची पातळी वाढली असून तिने आता धोक्याची पातळीही ओलांडली असल्याचे वृत्त आहे.

यमुनेच्या पाण्यामुळे राष्ट्रीय राजधानीत हाहा:कार !

देहलीतील सखल भाग पाण्याखाली गेला असून लाल किल्ल्याच्या भागातही पाणी घुसले आहे. यासह अनेक ठिकाणी रस्त्यावरील ट्रक आणि बस जवळपास पूर्णच बुडाल्या आहेत.

महाराष्‍ट्राला सर्वाधिक आपत्ती निवारण निधी !

ओला दुष्‍काळ, पूरग्रस्‍त, पावसाळ्‍यातील हानी आदी आपत्तींसाठी केंद्र शासनाकडून प्रत्‍येक राज्‍याला आपत्ती निवारण निधी दिला जातो. यंदा महाराष्‍ट्राला सर्वाधिक १४२०.८० कोटी रुपयांचा आपत्ती निवारण निधी मिळाला आहे.

आपत्तीमध्ये सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री उदय सामंत

अद्यापपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. तथापि तो पडणार नाही, असे नाही. संभाव्य पावसाचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपत्कालामध्ये सजग आणि सतर्क रहावे- उदय सामंत

मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशला ४ सहस्र कोटी रुपयांची हानी !

राज्यातील लाहौल स्पिती, तसेच कुल्लू जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या ३०० पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जोरदार पावसामुळे हिमाचल प्रदेशात १४ ठिकाणी भूस्‍खलन, ५ जण मृत्युमुखी !

राज्‍यात ‘रेड अलर्ट’ घोषित करण्‍यात आला असून पुढील दोन दिवसांसाठी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्‍याचा आदेश सरकारने दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाची संततधार चालू आहे.
* देवगड येथील शाळेतील वर्गात पाणी, तर मालवण तालुक्यातील शाळेचे छप्पर कोसळले
* सावंतवाडी-बेळगाव वाहतूक पाऊण घंटा ठप्प