|
गंगटोक (सिक्कीम) – सिक्कीममध्ये ३ ऑक्टोबरला झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २३ जण घायाळ झाले आहेत. अद्यापही २२ सैनिकांसह १०३ जण बेपत्ता आहेत. पुरात अजूनही ७ सहस्र लोक अडकले आहेत. यात लाचेन आणि लाचुंग येथील अनुमाने ३ सहस्र लोकांचा समावेश आहे. पूरस्थिती लक्षात घेता शिक्षण विभागाने १५ ऑक्टोबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याची सूचना दिली आहे.
सिक्किम में सैलाब से तबाही, सेना के 22 जवानों समेत 103 लोग अभी भी लापता; 6 हजार पर्यटक फंसे#Sikkim #CloudBurst https://t.co/X0Tlxo5J7V
— Zee News (@ZeeNews) October 6, 2023
नेपाळमधील भूकंपामुळे हिमालयातील लोनाक सरोवर फुटले असल्याची भीती शास्त्रज्ञांना आहे. मोठा पाऊस झाल्यामुळे सरोवरात तेवढे पाणी धरता येत नव्हते, त्यामुळे त्या पाण्यामुळे तिस्ता नदीला पूर आला. नदीच्या पाण्याची पातळी १५ ते २० फुटांनी वाढली. नदीलगतच्या परिसरात सैन्याची छावणी होती, ती पुरात वाहून गेली आणि तेथे उभी असलेली ४१ वाहनेही बुडाली. राज्य सरकारने तिस्ता खोर्याच्या काठावर सापडलेल्या संभाव्य स्फोटके आणि दारूगोळे यांविषयी स्थानिक जनतेला सावध केले आहे. ‘या दारूगोळ्यांपासून दूर रहा. याचे स्फोट होऊ शकतात. अशी उपकरणे दिसल्यास त्वरित कळवा’, असे प्रशासनाने सांगितले आहे.
सिक्कीममधील मंगन, गंगटोक, पाक्योंग आणि नामची या ४ जिल्ह्यांची पुरामुळे सर्वाधिक हानी झाली आहे. २५० हून अधिक घरांची हानी झाली, तर ११ पूल उद्ध्वस्त झाले आहेत. राज्य सरकारने या घटनेला आपत्ती घोषित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीममधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्याशी चर्चा करून त्यांना साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण