कुरापती नव्हे युद्धच !

कुरापती नव्हे युद्धच !

चीनची विस्तारवादाची भूक आसुरी आहे. चीनची सीमा तब्बल १४ देशांना लागून आहे. या ‘ड्रॅगन’ने भारताचा मोठा भूभाग आधीच गिळंकृत केला असून त्याला आता अरुणाचल प्रदेशही हवा आहे. त्यामुळे चीनला व्यापार, राजकारण, संरक्षण आधी सर्वच पातळ्यांवर धडा शिकवून नामोहरम करावे लागेल.

नावात बरेच काही आहे !

नावात बरेच काही आहे !

परकीय आक्रमकांनी बाटवलेली शहरांची नावे पालटली की, मोठा गदारोळ चालू होतो. प्रत्यक्षात आक्रमकांनी आपल्या संस्कृतीवर किती खोलवर आक्रमण केले आहे, त्याची व्याप्ती धक्कादायक आहे. मंदिरे पाडली, मूर्तीभंजन केले, शहरांची नावे पालटली यांसह मंदिरांत होणार्‍या विधींचीही नावे पालटली….

दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ !

दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ !

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार येऊन जवळपास दीड वर्ष होत आले आहे. अफगाणिस्तानची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती अत्यंत विदारक आहे. त्यातच ज्या तालिबानच्या मागे अनेक वर्षे पाकिस्तान खंबीरपणे उभा होता, ज्या पाकिस्तानमुळे तालिबानला अफगाणिस्तानची सत्ता मिळवता आली….

‘हलाल’च्या आडून लोकशाहीची हत्या !

‘हलाल’च्या आडून लोकशाहीची हत्या !

तेलंगाणा सरकारची धोरणे पहाता ते केवळ विशिष्ट समाजाच्या उत्कर्षासाठी झटते, हेच समोर येते. सातत्याने एकाच समाजाच्या हितासाठी काम करणार्‍या आणि हिंदूंच्या कार्यक्रमासाठी कायदा-सुव्यवस्थेची भीती दाखवणार्‍या राव यांना आता हिंदूंनी त्यांची शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे.

राजभाषा मराठी; मात्र उदात्तीकरण उर्दूचे !

राजभाषा मराठी; मात्र उदात्तीकरण उर्दूचे !

भविष्यात महाराष्ट्रात मराठी भाषाभवन उभेही राहील, मराठीला राजभाषेचा दर्जाही मिळेल; मात्र मराठीच्या उत्कर्षासाठी मुळात सरकारने नागरिकांमध्ये मराठी भाषेविषयी अस्मिता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने केवळ धोरण न ठरवता त्याची वास्तवातील प्रभावी कार्यवाही करण्याची  उपाययोजनाही ठरवायला हवी !

गुन्हेगार आणि मानवतावाद (?)

गुन्हेगार आणि मानवतावाद (?)

‘गुन्हेगारांना शिक्षा कशी करावी !’, याचा पाया शिवरायांच्या नीतीतून भारतात रचला गेला आहे. केवळ त्याचा अवलंब करणे, ही काळाची आवश्यकता आहे. अभिनव; पण कठोर शिक्षापद्धतींचा अवलंब करून भारत गुन्हेगारी आणि आतंकवाद यांपासून मुक्त करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे !

गुजरातमध्ये हिंदुत्वाची सुनामी !

गुजरातमध्ये हिंदुत्वाची सुनामी !

गुजरातच्या निवडणुकीमुळे प्रखर राष्ट्रवादाची भूमिका घेत हिंदुत्वाच्या सूत्रावर तितकेच आग्रही रहाणे, विकासाच्या सूत्रावर तडजोड न करणे, निवडणुकीत लोकांना दिलेली आश्वासने पाळणे या गोष्टींवर जर भर दिला, तर नागरिक भरभरून मते देतात, हेच परत एकदा या निमित्ताने सिद्ध झाले आहे.

लोकऐक्य महत्त्वाचे !

लोकऐक्य महत्त्वाचे !

महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात एक प्रदीर्घ सीमावाद आहे. या ‘सीमावादा’वर निर्णय होईल तेव्हा होईलच; पण राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मात्र एकत्र येऊन या ‘वादाची सीमा’ आता निश्चित केली पाहिजे ! यातच राष्ट्राचे भले आहे !!

मोगलप्रेमी विचारवंत !

मोगलप्रेमी विचारवंत !

मोगलांनी हिंदूंना विरोध केला असता, तर हिंदू शिल्लकच राहिले नसते !, असे वक्तव्य कर्नाटकातील निवृत्त जिल्हा न्यायाधीश वसंता मुळसावळगी यांनी केले. ‘मोगलांनी भारतात हिंदूंचे काय केले ?’, हा इतिहास आहे. तो दडपला गेला.

वैचारिक आतंकवादी !

वैचारिक आतंकवादी !

हिंदू ४० वर्षांपर्यंत लग्न करत नाहीत आणि या काळात २-३ अवैध बायका ठेवतात, असे संतापजनक विधान ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी नुकतेच केले. त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागल्यावर त्यांनी क्षमायाचना केली.