शिवसेनेच्या ११ खासदारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट !

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा दर्शवण्यासाठी हे खासदार अमित शहा यांना भेटले.

नवीन संसद भवनाच्या छातावर बसवण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून अनावरण

राष्ट्रीय प्रतीक असणार्‍या या अशोक स्तंभाचे वजन ९ सहस्र ५०० किलो इतके आहे. साडेसहा मीटर उंच असणारा हा स्तंभ कास्य धातुपासून बनवण्यात आला आहे. हा स्तंभ बसवण्यासाठी ६ सहस्र ५०० किलो वजनाचा स्टीलचा चबुतरा बनवण्यात आला आहे.

न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी विजय माल्या याला ४ मासांच्या कारावासाची शिक्षा

विदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्या याला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी ४ मासांच्या कारावासाची, तसेच २ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत ५ वर्षांत ८ पटींनी वाढ

संरक्षण क्षेत्रात भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याच्या प्रयत्नांना सातत्याने यश मिळत आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात ही १३ सहस्र कोटी रुपयांवर पोचली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि वरिष्ठ नेते यांची भेट !

ज्या राज्याला केंद्रशासनाचा पाठिंबा मिळतो, ते राज्य वेगाने प्रगतीकडे जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही केंद्रीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गव्हानंतर आता गव्हाच्या पिठावरही निर्यातबंदी

गव्हाच्या पिठासह मैदा, रवा आदी पदार्थांच्या निर्यातीवरही बंदी असेल. या पुढे निर्यातीसाठी केंद्र सरकारची अनुमती आवश्यक असल्याची माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने दिली.

देहलीतील फतेहपुरी मशिदीच्या शाही इमामांना ठार मारण्याची धमकी

कट्टरतावादी मुसलमानांकडून हिंदूंना ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशा वेळी ‘समतोल’ साधण्यासाठी त्यांच्याच धर्मबांधवांनी इमामांना धमक्या देऊन ‘आम्हालाही धमक्या मिळतात’ असे दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, तर यात आश्‍चर्य वाटू नये !

जून मासात चीनचे लढाऊ विमान भारताच्या सीमेजवळ आल्याचे उघड

सरकारने चिनी कुरापतींना जशास तसे उत्तर दिले पाहिजे !

(म्हणे) ‘माझी कालीमाता हिंदुत्व उद्ध्वस्त करते !’

सातत्याने हिंदूंच्या देवता आणि हिंदू यांच्याविषयी आपेक्षार्ह विधाने करणार्‍या लीना मणीमेकलई यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी भारत सरकारने कॅनडा सरकारवर आता दबाव आणला पाहिजे !

चिनी आस्थापन ‘विवो’वरील धाडीनंतर तिचे दोन महासंचालक देश सोडून पळाले !

देश सोडून पळून जाईपर्यंत अन्वेषण यंत्रणा झोपल्या होत्या का ?