कीर्तनकारांनी सांप्रदायिक, सामाजिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे ! – ह.भ.प. नरहरी महाराज, सचिव, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

आळंदी (पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वारकरी कीर्तनकार कार्यशाळा उत्साहात पार पडली !

आळंदी (जिल्हा पुणे), २५ मार्च, (वार्ता) – हिंदु जनजागृती समिती समवेत मी गेली अनेक वर्षे कार्य करत आहे. अनेक मोहिमा वारकरी संप्रदाय आणि समितीने एकत्रितपणे राबवल्या अन् त्या यशस्वी झाल्या आहेत, असे मत महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज यांनी व्यक्त केले. ‘डांगे पंच मंडळ कार्यालय’, आळंदी येथे २२ मार्च या दिवशी कीर्तनकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. १०० हून अधिक जणांची या कार्यशाळेला उपस्थिती लाभली. ह.भ.प. नरहरी महाराज पुढे म्हणाले की, आज या कार्यशाळेतून जे ज्ञान मिळेल, ते आपण आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून सर्व समाजात पोचवले पाहिजे. अशा प्रकारे कार्यशाळांचे आयोजन ठिकठिकाणी केले पाहिजे.

ह.भ.प. नरहरी महाराज

या कार्यशाळेत राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, तसेच लव्ह जिहाद, हलाल जिहाद आदींविषयी विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश पाठक यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. कार्यशाळेचा आरंभ दीपप्रज्वलनाने झाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट, पंडित महाराज क्षीरसागर, ‘जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थे’चे ह.भ.प. आत्माराम महाराज शास्त्री, निरंजन शास्त्री कोठेकर महाराज, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज हे मान्यवर उपस्थित होते.

विशेष उपस्थिती : गुरुवर्य ह.भ.प. बंडातात्या कर्‍हाडकर, ह.भ.प. नरहरी महाराज, ह.भ.प. आत्माराम महाराज, ह.भ.प. चोरघे महाराज, ह.भ.प. रामचंद्र पेनोरे, ह.भ.प. पद्माकर पाटोळे महाराज, पंडित महाराज क्षीरसागर, ह.भ.प. राम सूर्यवंशी महाराज (कीर्तनकार), ह.भ.प. रघुनाथ बापू चौधरी महाराज

डावीकडून ह.भ.प. निरंजनशास्त्री कोठेकर महाराज, ह.भ.प. आत्माराम महाराज शास्त्री, पंडित महाराज क्षीरसागर, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, श्री. सुनील घनवट

मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन !

धर्माविना मनुष्य जगू शकणार नाही, त्यामुळे धर्माचे ज्ञान असणे आवश्यक आहे ! – ह.भ.प. आत्माराम महाराज शास्त्री

मनुष्याला धर्माची आवश्यकता आहे. धर्म हे जीवन आहे. ज्याप्रमाणे भूमी वृक्षाला आधार देते. त्याप्रमाणे धर्म मनुष्याला आधार देतो. धर्माविना मनुष्य जगू शकणार नाही. धर्म ही आपली आई आहे. त्यामुळे आपल्याला धर्माचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे मत ह.भ.प. आत्माराम महाराज यांनी मांडले.

हिंदूंच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी राज्यघटनात्मक हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

नियमितपणे होत असलेल्या गोहत्या, मंदिर सरकारीकरणामुळे असुरक्षित असलेली मंदिरे, शहरी नक्षलवाद, रोहिंग्यांची घुसखोरी, काश्मिरी हिंदूंच्या समस्या, लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल जिहाद, धर्मांतर आदी अनेक समस्या सोडवण्यासाठी घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. आपण आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी सक्षमपणे एकत्रित कृती केली पाहिजे. धर्मशिक्षण घेतले पाहिजे, असे मत िहंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी या वेळी व्यक्त केले.

‘वक्फ बोर्ड कायदा १९९५’ याच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हायला हवे ! – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

‘वक्फ बोर्ड कायदा १९९५’ मधील ‘सेक्शन ४०’ नुसार वक्फ बोर्ड कोणत्याही खासगी, सरकारी आणि बिगर सरकारी भूमींवर, मालमत्तांवर स्वत:च्या मालकीचा दावा करू शकतो. यासाठी सर्वांनी याला संघटितपणे विरोध करायला हवा.

भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे षड्यंत्र म्हणजे हलाल जिहाद ! –  पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

आज भारतात हलाल जिहादच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा हा डाव आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूपर्यंत ‘हलाल जिहाद’च्या षड्यंत्राची माहिती पोचवून हा जिहादी प्रयत्न रोखण्याची आवश्यकता आहे.

लव्ह जिहादविषयी जागृती करणे आवश्यक आहे ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा

भारतात लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक महिला, मुली याला बळी पडत आहेत. आज मुलींना लव्ह जिहादचे गांभीर्य लक्षात आणून दिले पाहिजे, असे रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी सांगितले.

कीर्तनकार कार्यशाळेत उपस्थित कीर्तनकारांनी व्यक्त केलेले विचार !

  शेवटी सांगता झाल्यानंतर अनौपचारिक चर्चा झाली. त्या वेळी तरुण वारकरी, कीर्तनकार यांचा पुष्कळ चांगला प्रतिसाद होता. ‘बर्‍याच जणांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा आमच्या गावातही आम्ही घेऊ’, अशी प्रतिक्रिया दिली.

  आज या कार्यशाळेत जे विषय आम्हाला शिकायला मिळाले, ते पूर्वी कुठेच ऐकले नव्हते आणि आम्ही आमच्या प्रवचनांमध्येसुद्धा हे विषय सांगत जाऊ, असे त्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले.

  आज ज्या प्रकारची कार्यशाळा येथे झाली. अशी कार्यशाळा प्रत्येक महिन्याला आपण येथे आळंदीमध्ये घेत जाऊ, असेही उत्स्फूर्तपणे सर्व तरुण वारकरी विद्यार्थ्यांनी सांगितले.

  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या अष्टमीला सत्संग आळंदीमध्ये घेण्याचे ठरवण्यात आले.