अतीवापर धोकादायक !
विज्ञानाने मानवाला अनेक भौतिक सुविधा दिल्या; परंतु त्याचा वापर किती वेळ करावा ? हे विज्ञान शिकवू शकत नाही. ‘अती तेथे माती’ होऊ नये, यासाठी मनावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. षड्रिपू नियंत्रणात असतील, तरच हे शक्य आहे. ते नियंत्रणात ठेवायला विज्ञान नव्हे, तर अध्यात्मच हवे, हे नक्की !