‘डेसिबल’चा नियम एकाच धर्माला सांगू शकत नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत एका मुसलमान पत्रकाराने त्याच्या लहान मुलाला भोंग्याचा त्रास होत असल्याचे मौलवीला सांगितले. मुसलमान समाजालाही भोंग्याचा त्रास होतो.

सोलापूर बसस्थानकात बसगाड्यांची कोंडी !

सांगली, लातूर, कोल्हापूर, कोकण, पुणे यांसह कर्नाटक येथे जाणार्‍या बसगाड्या मोठ्या प्रमाणात सोलापूर बसस्थानकातून जातात. याचसमवेत पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर येथील तीर्थक्षेत्रांना जाणार्‍या बसगाड्यांची संख्याही अधिक आहे.

मुंबईतील वृत्तपत्रांच्या किमती १ जूनपासून वाढवण्याचा निर्णय !

मुंबईतील वृत्तपत्रांच्या किमती १ जूनपासून वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी त्याग न केल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गेल्या ८ वर्षांत राम मंदिर निकाल, ३७० कलम आणि तिहेरी तलाक रहित करणे अशा अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या; मात्र ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे’ हे समस्त हिंदू बांधव, हिंदु संघटना आणि हिंदू नेते यांच्यापुढील मोठे आव्हान आहे.

अब्दुल सत्तार यांना महसूल राज्यमंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री या पदांवरून हटवा !

जिल्ह्याचे पालकमंत्री असणार्‍या अब्दुल सत्तार यांचा हनुमानाविषयी अश्लील भाषेत विधाने करणारा व्हिडिओ प्रसारित झाला होता. यातून त्यांची धर्मांध मानसिकता दिसून येते. त्यांच्या विधानांमुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या काळात महाराष्ट्रात रोखले १ सहस्र ३३८ बालविवाह !

राज्यामध्ये एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या काळात राज्यातील विविध भागांमध्ये १ सहस्र ३३८ बालविवाह प्रशासनाने रोखले होते. बालविवाहांची होणारी संख्या लक्षात घेता आता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणार्‍या विवाहांवरही …

तुळजापूर खुर्द (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिराचा कळसारोहण सोहळा मोठ्या उत्साहात !

तुळजापूर खुर्द येथील श्री तुळजाभवानी मंदिराचा कळसारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने २६, २७ आणि २८ एप्रिल या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने घट !

उजनी धरणाचा पाणीसाठा ३० टक्क्यांनी खाली म्हणजेच २९.५१ टक्क्यांवर आला असून धरणात केवळ १५.८१ टी.एम्.सी. उपयुक्त पाणी शिल्लक राहिले आहे.

महाराष्ट्रात ‘शेर शिवराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चित्रपटगृहे अनुपलब्ध ! – दिग्दर्शकाची खंत

आशयघन आणि ऐतिहासिक विषय असणार्‍या मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात, विशेषतः छत्रपती शिवरायांच्या राज्यातच चित्रपटगृहे मिळत नाहीत. त्यासाठी सतत संघर्ष करावा लागणे दुर्दैवीच !

मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष अन् गड-दुर्ग यांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय !

शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष, तसेच गड-दुर्ग यांनी नावे न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.