आजपासून करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव !

पहिल्या दिवशी सूर्याची किरणे थेट श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या चरणांवर पडतात.

भारतातील सर्वच क्षेत्रांत बोकाळलेला भ्रष्टाचार !

‘वृत्तपत्र उघडले किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्या ऐकल्या, तरी त्यामध्ये ‘भ्रष्टाचार’ या विषयावरील चर्चा सातत्याने बघायला मिळते. यात उच्चपदस्थ अधिकार्‍यांपासून सर्वसामान्य व्यक्ती, सरकारी नोकर यांनी केलेला भ्रष्टाचार आणि त्यांना झालेली अटक यांविषयीच्या बातम्या प्रकर्षाने दिसतात.

सुकूर येथे पश्‍चिम बंगालस्थित धर्मांधाकडून १० वर्षीय मुलीचा विनयभंग

सुकूर, आरडी येथे एका अल्पवयीन मुलीचा पश्‍चिम बंगालस्थित आरोपी महंमद याने विनयभंग केला. गोव्यातून पळून जाण्याच्या सिद्धतेत असतांना पर्वरी पोलिसांनी आरोपी महंमद याला शिताफीने कह्यात घेतले.

मर्यादित वेळेत सर्वसामान्यांना लोकल मुभा देणे म्हणजे शुद्ध धूळफेक ! – लोकल प्रवासी संघटनांचे मत

३ राजकीय पक्षांच्या जात्यात सामान्य प्रवासी भरडला जात असून सुस्पष्ट निर्णय घेतला जात नाही. गेले १० मास सर्वसामान्यांना प्रवास यातना सहन कराव्या लागत आहेत. मर्यादित वेळेत सर्वसामान्यांना लोकलमुभा देणे म्हणजे शुद्ध धूळफेक आहे, असे लोकल प्रवासी संघटनांनी म्हटले आहे.

महापालिका आयुक्तांच्या आदेशाने कुपवाड (सांगली) मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ

सूतगिरणी ते कुपवाड औद्योगिक वसाहतीच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे असल्याची तक्रार उद्योग मित्र बैठकीत करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद घेत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या मार्गावरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते.

पिंगुळी येथे आज प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा

पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा ३१ जानेवारी २०२१ या दिवशी त्यांच्या येथील समाधी मंदिरात साजरा होणार आहे.

पुणे येथील ‘ऑनलाईन’ ‘सेक्स रॅकेट’ उघडकीस; हिंजवडी पोलिसांची कारवाई

‘ऑनलाईन’ माध्यमातून गिर्‍हाईकांचा शोध घेऊन त्याद्वारे वेश्या व्यवसाय चालवणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी १३ तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी अर्जुन प्रेम मल्ला या व्यक्तीला अटक केली आहे.

कुणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देश यांना प्राधान्य देतो ! – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेणार्‍या अण्णा हजारे यांनी उपोषणापूर्वीच माघार घेतली. त्यामागची कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत.

सुलेमानी सूड !

काँग्रेसच्या काळाच्या तुलनेत या सरकारच्या काळात घातपाती कारवायांवर लगाम लावण्यात आला आहे, हे नाकारता येणार नाही. या पार्श्‍वभूमीवर आताच्या झालेल्या स्फोटाकडे सरकार गांभीर्याने लक्ष देईल आणि ते करणार्‍यांची पाळेमुळे खणून काढील, हीच अपेक्षा !

आतंकवाद्यांना धर्म असतो !

राजधानीत इस्रायलच्या दूतावासासमोर झालेल्या स्फोटाचे दायित्व जैश-उल्-हिंद या आतंकवादी संघटनेने स्वीकारले. ‘सर्वशक्तीमान अल्लाच्या कृपेने आणि साहाय्यामुळे हा स्फोट करण्यात आला’, असे तिने म्हटले आहे.