
नगर – शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेणार्या अण्णा हजारे यांनी उपोषणापूर्वीच माघार घेतली. त्यामागची कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत. तथापि अण्णांनी उपोषण जाहीर करून ते मागे घेण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असणार्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात अण्णांच्या उपोषणामागच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.
याविषयी अण्णांनी तीव्र शब्दांत अप्रसन्नता व्यक्त करत ‘समाज आणि देश यांच्या दृष्टीने घातक कृत्य घडतात, तेव्हा आम्ही आंदोलन करतो. कोणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देश यांना प्राधान्य देतो’, अशी भूमिका मांडली. तसेच तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही तो कसा पाठीशी घातला ?, याविषयीची सगळी माहितीच देईन, अशी आक्रमक भूमिका घेत अण्णांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना
महाराष्ट्र शासनाकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना घोषित !
शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा न करताच तानाजी पाटील यांचे उमेदवारी आवेदन !
BJP Leader Murder : जयपूरमध्ये भाजपच्या नेत्याची शिरच्छेद करून निर्घृण हत्या
जरांगे यांचे ‘आमरण उपोषण’ मध्यरात्री स्थगित
राज्यात २ जूनपासून आंदोलनांसह घंटानाद, महाआरती आणि स्वाक्षरी अभियान यांस प्रारंभ !