प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आदी आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

वास्तविक अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून अशा आस्थापनांच्या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे !

अर्णब गोस्वामी यांनी पार्थो दासगुप्ता यांना अनेकदा पैसे दिल्याचा पुरवणी आरोपपत्रात पोलिसांचा दावा

पोलिसांना दिलेल्या जबाबात दासगुप्ता यांनी सांगितले, ‘‘रिपब्लिक टीव्हीला क्रमांक एकचे रेटींग मिळावे, यासाठी मी माझ्या टीमसमवेत काम करायचो आणि टी.आर्.पी.मध्ये फेरफार करायचो.

(म्हणे) ‘महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटवला, तर रक्तपात होईल !’ – नागराज वाटाळ, कन्नड संघटना

देशात आपण कायद्याचे राज्य आहे, असे एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे नागराज वाटाळ यांच्यासारखे थेट कायदा हातात घेण्याची भाषा करतात ! समाजात फूट पाडणारी अशाप्रकारे वक्तव्ये करणार्‍यांवर प्रशासनाने योग्य वेळी कारवाई करणे आवश्यक आहे !

विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे ! – प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत नारळीकर यांनी दूरचित्र संवादाद्वारे मनोगत व्यक्त केले. विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे; पण आपणच मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास भाग पाडतो.

पोलिसांच्या अनुमतीनंतर ३० जानेवारीला पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन

कोरेगाव भीमा येथील या हिंसाचाराला एल्गार परिषदेची किनार असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते; मात्र आता ३ वर्षांनंतर पुन्हा एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी अनुमती दिल्यामुळे आता ही परिषद होत आहे.   

येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला !

येस बँकेत झालेल्या घोटाळाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले या बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी या दिवशी फेटाळून लावला आहे.

ओबीसींची जातीनिहाय जनगणना हवी ! – पंकजा मुंडे, नेत्या, भाजप

धनंजय मुंडे प्रकरण संवेदनशील असल्याने त्याचे मी राजकीय भांडवल करणार नाही !

‘तांडव’ वेब मालिकेवर बंदी घालणे आणि राष्ट्रध्वजाचा मान राखणे या दोन विषयांसाठी जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने

प्रजासत्ताकदिनी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आणि ‘तांडव’ वेब मालिकेवर बंदी घालण्याविषयी जिल्ह्यातील भुसावळ, यावल, चोपडा, धरणगाव, एरंडोल येथील पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.

ईशनिंदाविरोधी कायदा तात्काळ करावा आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणा

देवतांचा वेगवेगळ्या माध्यमातून सर्रास होणारा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा तात्काळ करावा.  हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि जातीय द्वेष पसरवणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,…

सेवामुक्त करण्यात आलेल्या परिचारिकांना पुन्हा सेवेत घेण्याच्या मागणीसाठी परिचारिकांचे निषेध आंदोलन

काही दिवसांपूर्वी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या जळीत प्रकरणाच्या संदर्भात चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर ७ लोकांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.