राज्यशासनाकडून नवीन एकात्मिक बांधकाम नियमावली संमत

राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीचा कोल्हापूरलाही लाभ होणार असून २३ मजली इमारतीला अनुमती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुण्यात कोरोना प्रतिबंधाचे नियम न पाळणार्‍या व्यावसायिकांवर कारवाईचे आदेश

शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्यावसायिक आस्थापने, तसेच सार्वजनिक ठिकाणी केले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भातील आदेश अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काढले आहेत.

कोरोनाच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या आस्थापनांवर कारवाई ! – सांगली महापालिका आयुक्त

सार्वजनिक ठिकाणी कोरोना संबंधीच्या उपाययोजना केल्या जात नाहीत किंवा कोरोना संबंधीच्या आदेशाचे पालन होत नाही, त्या आस्थापनांना एक लेखी सूचना देऊन ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी चेतावणी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे. 

कोल्हापूर येथील नागरिकांच्या दैनंदिन तक्रार निवारणासाठी महापालिकेची ‘टोल फ्री’ सुविधा

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने १८००-२३३-१९१३ या ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधा चालू केली असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त

कार्तिकी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा होणार नसली, तरी शहर आणि परिसर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

‘नेटफ्लिक्स’वर प्रकाशित ‘लूडो’ चित्रपटातूनही हिंदु देवी-देवतांचे विडंबन !

हिंदूंच्या श्रद्धा, प्रथा-परंपरा यांचा ऊठसूठ अनादर करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा कायदा लवकरात लवकर करून हिंदूंना न्याय द्यावा, अशी केंद्र सरकारकडून अपेक्षा !

धाडस असेल, तर भाजप सरकारने चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवावे ! – असदुद्दीन ओवैसी यांचे आव्हान

ओवैसी म्हणाले, नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राइक करा. चीनवर तुम्ही गप्प का बसला आहात ? तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात आणि चीनचे नाव घेण्यासही घाबरत आहात. तुम्ही सर्जिकल स्ट्राइक करा, आम्ही तुमची प्रशंसा करू !

लालूप्रसाद यादव कारागृहातून बिहार सरकार पाडण्याचा कट रचत आहेत ! – भाजपचा आरोप

बिहार सरकारने या आरोपाची चौकशी करावी आणि जर हे सत्य असेल, तर लालूप्रसाद यादव यांना कारागृहात भ्रमणभाष संच कसा उपलब्ध झाला, याचाही शोध घेऊन संबंधितांना आजन्म कारागृहात डांबावे !