कोल्हापूर – येथील नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने १८००-२३३-१९१३ या ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधा चालू केली असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. महापालिकेच्या संदर्भातील गटार स्वच्छ करणे, औषध फवारणी, कचरा उठाव, किरकोळ स्वरूपाचे अतिक्रमण, पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील तक्रारी, विजेच्या खांबांवर बल्ब बसवणे, स्वच्छता आणि आरोग्य यांच्या संदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांनी महापालिकेत न जाता स्वतःच्या निवासस्थानाहून तक्रार नोंद करावी. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केल्यानंतर त्यांच्या भ्रमणभाषवर लघुसंदेशाद्वारे कळवण्यात येणार आहे. आतापर्यंत ६ सहस्र ३३८ तक्रारी प्रविष्ट करण्यात आले असून ६ सहस्र ३११ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > कोल्हापूर येथील नागरिकांच्या दैनंदिन तक्रार निवारणासाठी महापालिकेची ‘टोल फ्री’ सुविधा
कोल्हापूर येथील नागरिकांच्या दैनंदिन तक्रार निवारणासाठी महापालिकेची ‘टोल फ्री’ सुविधा
नूतन लेख
- Goa Lineman Death : डिचोली (गोवा) येथे वीज कर्मचार्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू
- ‘गॅरेंटी’ (हमी) देण्यासाठी पुष्कळ धैर्य लागते ! – पंतप्रधान मोदी
- समीर वानखेडे प्रकरणी चौकशीतून काय निष्पन्न झाले ? – मुंबई उच्च न्यायालयाची एन्.सी.बी.ला विचारणा
- महाराष्ट्रात मतांसाठी मद्याचे प्रलोभन, आचारसंहितेच्या काळात ४ सहस्र २५५ गुन्हे नोंद !
- महाराष्ट्रातील ५ जागांवर मतदान !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नागपूर येथे मतदान केंद्रात निघाला साप !; तृतीय पंथियांसाठी वेगळे मतदान केंद्र…