
बारामती (जिल्हा पुणे) – वक्फ बोर्डाविषयी ज्या समाजाचा प्रश्न आहे, त्या समाजाचे ऐकल्याविना आम्ही वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये पालट करू देणार नाही. तुम्ही त्या समाजाला विचारा. मानसन्मान करा. वक्फ बोर्डाच्या वेळी मतदान झाले. तेव्हा या राज्यातील किती पक्षांनी मतदान केले ? याचेही उत्तर त्यांना द्यावे लागेल. ज्यांना सोयीचे होते, ते तेथून गायब झाले, असे चालणार नाही. हो किंवा नाही, असे उत्तर द्यावे लागेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली. बारामती येथे ‘कार्यकर्ता संवाद मेळाव्या’मध्ये त्या बोलत होत्या. वक्फ बोर्डावरून मला ‘ट्रोल’ केले जाते. काय बोलायचे ते बोला, मला काही फरक पडत नाही, असेही त्या शेवटी म्हणाल्या.
अहिल्यानगर येथे धार्मिक सहलीचे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक !
‘हिंदु खाटिक समाज आर्थिक विकास महामंडळा’च्या योजनांचा लाभ घेण्याचे अवाहन !
राज्यातील धरणांमध्ये २५ टक्के पाणीसाठा शेष !
श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात निर्माण होणार ‘हेरिटेज वाडी’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली भूमीची पहाणी
आजपासून पावसाळ्याचे विशेष वेळापत्रक लागू !
श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथे पुलाच्या कामासाठी केले जात असलेल्या अवैध सुरुंग स्फोटांमुळे मंदिराला धोका !