श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी हवे २२ सहस्र कोटी रुपये !  

श्रीलंका दिवाळखोर झाला आहे. देशाकडे केवळ ५ सहस्र कोटी रुपयांची विदेशी चलनाची गंगाजळी शिल्लक राहिली आहे. या स्थितीतून श्रीलंकेला  बाहेर येण्यासाठी सुमारे २२ सहस्र कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

श्रीलंकेत भारतीय सैन्य तैनात होणार नाही ! – भारतीय उच्चायुक्त 

श्रीलंकेतील आर्थिक संकटावरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे येथे भारतीय सैन्य तैनात करण्याविषयी चर्चा चालू आहे. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त यांनी ‘याविषयीच्या अफवा निराधार आहेत’, असे म्हटले आहे.

भारताकडून श्रीलंकेला ७६ सहस्र मेट्रिक टन पेट्रोल-डिझेलचे साहाय्य !

मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करत असलेल्या श्रीलंकेला भारत सातत्याने साहाय्य पुरवत आहे. भारताने श्रीलंकेला इंधनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेल यांचा पुरवठा केला.

श्रीलंकेने आणीबाणी उठवली

राजधानी कोलंबोमध्ये मुसळधार पावसात सहस्रो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या घरावर मोर्चा काढला. ‘सरकारने चीनला सर्व काही विकून टाकल्याने सरकारकडे आता पैसेच नाहीत’, असा आरोप आंदोलकांनी केला.

राष्ट्रपतीपद सोडण्यास गोटबया राजपक्षे यांचा नकार !

श्रीलंकेमध्ये सध्या आर्थिक संकटामुळे अराजकसदृश्य स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती गोटबया राजपक्षे यांनी पदाचे त्यागपत्र देण्याची विरोधी पक्षांची मागणी फेटाळली आहे. तसेच ‘संसदेत बहुमत सिद्ध करणार्‍या पक्षाला सत्ता सोपवण्यास आम्ही सिद्ध आहोत’, असेही त्यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेच्या मंत्रीमंडळाचे त्यागपत्र

श्रीलंका सरकारमधील सर्वच्या सर्व २६ मंत्र्यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे; मात्र महिंदा राजपक्षे पंतप्रधानपदी कायम आहेत. देशातील सर्वपक्षांचे सरकार स्थापन करण्यात येणार असल्याने त्यांना मंत्रीमंडळात सहभागी करण्यात येणार आहे.

श्रीलंकेमध्ये सामाजिक माध्यमांवर बंदी

श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सर्व सामाजिक माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे.

श्रीलंकेत आणीबाणी लागू !

श्रीलंकेमधील आर्थिक संकटामुळे नागरिकांकडून होत असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे देशात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वीच नागरिकांनी राष्ट्रपती गोटबाय राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर हिंसक आंदोलन केले होते.

श्रीलंकेत नागरिकांकडून राष्ट्रपतींच्या घराबाहेर हिंसक आंदोलन

आंदोलन करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्यावर हिंसा चालू झाली. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर बाटल्या आणि दगडफेक केली. पोलिसांनी अश्रूधुरासमवेतच पाण्याचा मारा करून आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

श्रीलंकेत नागरिकांकडून राष्ट्रपतींच्या घराबाहेर हिंसक आंदोलन

श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सर्वसमान्यांचे हाल होत असल्याने स्थानिकांनी ३१ मार्चच्या रात्री राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ‘राष्ट्रपतींनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी केली.