राजपक्षे कुटुंबियांनी भारतात आश्रय घेतलेला नाही ! – भारतीय दूतावासाचे स्पष्टीकरण

दूतावासाने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांवरून अफवा पसरवली जात आहे की, श्रीलंकेतील काही राजकीय व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय भारतात पळून गेले आहेत; मात्र हे वृत्त चुकीचे आहे.

श्रीलंकेत पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या त्यागपत्रानंतर प्रचंड हिंसाचार

राजपक्षे यांचे वडिलोपार्जित घर जाळले
खासदाराने केली आत्महत्या !

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे त्यागपत्र

दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू असतांनाच पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी त्यागपत्र दिले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून विरोधी पक्षांकडून त्यांचे त्यागपत्र मागण्यात येत होते.

श्रीलंकेत आणीबाणी लागू !

देशात चालू असलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे महिंदा राजपक्षे यांनी अर्थमंत्री बेसिल राजपक्षे यांना पदावरून हटवले आहे.

श्रीलंकेच्या विध्वंसाची कारणे : कोविड, रासायनिक खते आणि चीनचे कर्ज !

श्रीलंकेच्या अधःपतनाचे वास्तव जाणून घेण्यासाठी ‘वायर’ संकेतस्थळाच्या प्रतिनिधीने प्रसिद्ध पर्यावरणवादी वंदना शिवा यांच्याशी संवाद साधला. त्यांनी अधःपतनाला जैविक शेती नाही, तर कोविड, रासायनिक खते आणि कर्ज कारणीभूत असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.

माझ्या चुकांमुळे देश आर्थिक संकटात ! – गोटाबाया राजपक्षे, राष्ट्रपती, श्रीलंका

गोटाबाया राजपक्षे म्हणाले की, वर्ष २०२० मध्ये रासायनिक खतांच्या वापरावर घातलेल्या बंदीसाठी मला खेद आहे. या निर्णयामुळे देशातील धान्याचे उत्पादन पुष्कळ अल्प झाले. यामुळे नागरिकांकडून आंदोलने करण्यात आली. माझा हा निर्णय चुकीचा होता.

आर्थिक डबघाईला आलेल्या श्रीलंकेत नव्या मंत्रीमंडळाची स्थापना !

गेल्या काही आठवड्यांपासून भारताशेजारील देश श्रीलंकेवर भीषण संकट ओढावले आहे. तेथील सत्तेवर असलेल्या राजपक्षे परिवाराच्या चुकीच्या धोरणांमुळे श्रीलंका आर्थिक डबघाईला आली. यामुळे संतप्त जनतेकडून हिंसक आंदोलने करण्यात आली.

श्रीलंकेमधील लोक अन्नधान्यासाठी विकत आहेत दागिने !  

श्रीलंकेच्या चलनाच्या मूल्यात झालेल्या ऐतिहासिक घसरणीनंतर दागिने खरेदी करणार्‍यांची संख्या अत्यंत अल्प आणि ते विकणारे अधिक झाले आहेत.

श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी हवे २२ सहस्र कोटी रुपये !  

श्रीलंका दिवाळखोर झाला आहे. देशाकडे केवळ ५ सहस्र कोटी रुपयांची विदेशी चलनाची गंगाजळी शिल्लक राहिली आहे. या स्थितीतून श्रीलंकेला  बाहेर येण्यासाठी सुमारे २२ सहस्र कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

श्रीलंकेत भारतीय सैन्य तैनात होणार नाही ! – भारतीय उच्चायुक्त 

श्रीलंकेतील आर्थिक संकटावरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे येथे भारतीय सैन्य तैनात करण्याविषयी चर्चा चालू आहे. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त यांनी ‘याविषयीच्या अफवा निराधार आहेत’, असे म्हटले आहे.