महाविकास आघाडीच्या नागपूर येथील सभेच्या विरोधात नागरिकांची नागपूर खंडपिठात जनहित याचिका !

दर्शन कॉलनी येथील मैदान परिसर हा रहिवासी भाग आहे. लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आणि या भागात असलेल्या रुग्णांचा विचार करता या मैदानावरील सभेची अनुमती नाकारावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

प्रशासनाने रत्नागिरी बसस्थानकावरील खड्डे बुजवले, प्रवेशद्वारावरील सांडपाण्याचीही लावली योग्य विल्हेवाट !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम ! यापुढेही प्रतिदिन बसस्थानकाची स्वच्छता राहील, अशी व्यवस्था प्रशासनाने करायला हवी आणि ज्या प्रवाशांकडून अस्वच्छता होते, त्यांना दंड ठोठावयाला हवा. असे केल्यास येथील स्वच्छता टिकून राहील !

विदेशी अर्थपुरवठ्याच्या प्रकरणी ‘बीबीसी इंडिया’विरुद्ध गुन्हा नोंद !

ईडी ‘बीबीसी इंडिया’द्वारे केलेल्या कथित परकीय गुंतवणुकीच्या  (एफ्.डी.आय.च्या) नियमांच्या उल्लंघनाचीही चौकशी करत आहे. यापूर्वी आयकर विभागाने बीबीसीच्या देहली आणि मुंबई कार्यालयांत धाड टाकली होती.

भारतात नियम पाळावे लागतील अन्यथा कारागृहात जावे लागेल ! – ट्विटरचे इलॉन मस्क यांची स्पष्टोक्ती

भारतात सामाजिक माध्यमांवर कठोर निर्बंध आहेत. त्यामुळे आमचे संकेतस्थळ अमेरिका किंवा इतर पाश्‍चात्त्य देशांतील ट्विटर वापरकर्त्यांना जेवढे स्वातंत्र देते, तेवढे समान स्वातंत्र्य भारतीय ट्विटर वापरकर्त्यांना देऊ शकत नाही.

गायनाच्या कार्यक्रमांमध्ये गायक गाण्याऐवजी ओठांची केवळ हालचाल करतात ! – गायक पलाश सेन यांचा दावा

रिअ‍ॅलिटीच्या नावावर तिथे काहीच रिअ‍ॅलिटी (सत्यता) नसते. या शोमध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना नसतात. तो केवळ एक टीव्ही शो असून तो ‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेसारखा पहायला हवा.

भरतपूर (राजस्थान) येथे महाराज सूरजमल आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवण्याच्या वादातून हिंसाचार

कुम्हेर चौकात महाराजा सूरजमल, बल्लारा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नगर चौकात भगवान परशुराम यांचा पुतळा बसवण्यात येणार होता.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट !

माझे आजोबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या खोट्या आरोपांमुळे सावरकरांची अपकीर्ती झाली आहे.

बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या निविदेच्या अटी आणि शर्ती २ सप्ताहांमध्ये निश्चित करू ! – महापालिका प्रशासन

या प्रकल्पामुळे वेताळ टेकडीवरील जैवविविधता धोक्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. विविध मार्गांनी आंदोलन करत हा प्रकल्प रहित करण्याची मागणीही केली जात आहे.

रत्नागिरी येथे १५ एप्रिल या दिवशी ‘हिंदु गर्जना मोर्चा’

आज बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची आवश्यकता आहे. रोंहिग्यांची संख्या तर वाढतच आहे. ‘एन्.आर्.सी.’सारखा कायदा होणे आवश्यक आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत.

बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध ! – पालकमंत्री उदय सामंत

गेल्या वर्षापेक्षा यावर्षीचे आंबा उत्पादन केवळ १२ ते १५ टक्के असल्याचे कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी सांगितले आहे. तसा अहवाल त्यांनी तात्काळ शासनाकडे सादर करावा.