महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्ष विसर्जित करा ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – काँग्रेसला महात्मा गांधी यांच्याविषयी आदर नाही. महात्मा गांधी यांना काँग्रेस मानत असती, तर तिने त्यांच्या सूचनेवर कार्यवाही केली असती. महात्मा गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले होते, ‘स्वातंत्र्य मिळाले आहे. काँग्रेसची उपयुक्तता संपली आहे. आता काँग्रेसचे विसर्जन करावे. असे केले नाही, तर काँग्रेस पक्ष हा देशाच्या प्रगतीत अडथळा ठरेल.’ महात्मा गांधी यांच्या या सूचनेचे पालन करून काँग्रेस पक्ष विसर्जित करावा. त्यानंतरच त्यांना महात्मा गांधी यांच्यावर बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. २ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीनिमित्त ते प्रसिद्धमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.