Khajur Jihad : बिया काढून टाकलेल्‍या खजुराला स्‍पर्श करू नका ! – श्री श्री रविशंकर

‘खजूर जिहाद’पासून सावधान

आध्‍यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर

बेंगळुरू – यापूर्वी ‘लव्‍ह जिहाद’विषयी बरेच ऐकले होते, ‘थुंकी जिहाद’ही चर्चेत राहिला आहे. आता ‘खजूर जिहाद’ची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध आध्‍यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी, ‘काही ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्‍यात आलेल्‍या खजुरांचा चावा घेऊन त्‍यातून बिया काढल्‍या जातात’, अशी माहिती दिली आहे. याविषयीचा व्‍हिडिओ काही दिवसांपूर्वी सामाजिक माध्‍यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता. त्‍याचा उल्लेख श्री श्री रविशंकर यांनी केला. श्री श्री रविशंकर म्‍हणाले, ‘‘ते (मुसलमान) खजुरामधून बिया काढत आहेत. कारखान्‍यात बरेच लोक उभे आहेत आणि ते खजूर चावून त्‍यातून बिया काढून टाकत आहेत. ते सांगतात की, ते खजुराला हलाल (इस्‍लामनुसार पवित्र) करत आहेत.’’ श्री श्री रविशंकर पुढे म्‍हणाले, ‘‘हे देवा, ही मोठी चुकीची गोष्‍ट आहे. त्‍यामुळे बिया काढून टाकलेल्‍या खजुराला कधीही स्‍पर्श करू नका.’’

खजूर बहुतेक इस्‍लामी देशांमध्‍ये पिकतो. खजुरांच्‍या पॅकेटवर ‘हलाल’ लिहिले असेल तर ‘तोंडी हलाल’ (खजूर चावून त्‍यातून बिया काढणे) केले गेल्‍याची निश्‍चिती बाळगा, असे सांगण्‍यात येत आहे.  निवृत्त आय.ए.एस्. अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनीही श्री श्री रविशंकर यांचा व्‍हिडिओ ‘शेअर’ करतांना चेतावणी दिली आहे.

संपादकीय भूमिका

धर्मांध मुसलमान जगाच्‍या पाठीवर कुठेही असले, तरी ते जिहाद करतात, याचे हे उदाहरण ! अशांपासून स्‍वतःचे रक्षण करण्‍यासाठी हिंदू काय करणार आहेत ?