शिवप्रेमी संघटनेच्या वतीने राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीदिनी नूतनमूर्तीचे अनावरण

येथील शिवप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना यांच्या वतीने जिजामाता चौकातील राजमाता जिजाबाई यांच्या नूतनमूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यांच्या जयंतीदिनी शहरातील प्रतिष्ठित नागरिक देवदत्त नाडकर्णी यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.

ब्रेक निकामी झाल्याने घारपी घाटात एस्.टी.ला अपघात

घारपी येथून बांद्याच्या दिशेने येतांना घारपी-बांदा ही एस्.टी. बस  घारपी घाटात कोसळून अपघात झाला. ही घटना १२ जानेवारीला सकाळी घडली. बसमध्ये एकूण ११ प्रवासी होते.

कांदळवन अवैधरित्या तोडणार्‍यांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

तालुक्यातील तळवणे गावात कांदळवनाची अवैध तोड होत आहे; मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

अग्नीशामक तपासणीच्या (फायर ऑडिट) प्रतिक्षेत जिल्हा शासकीय रुग्णालय !

गत एक तप सातारा जिल्हा रुग्णालयाची अग्नीशामक तपासणी (फायर ऑडिट) झाले नसल्याची गोष्ट समोर आली आहे. यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय अग्नीशामक तपासणीच्या (फायर ऑडिट) प्रतिक्षेत असल्याची माहिती आहे.

महिलांनी स्वरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – आँचल दलाल 

सावित्रीबाई फुले यांनी समाजातील महिलांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली. याच समवेत महिलांनी स्वरक्षणासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस उपअधीक्षक आँचल दलाल यांनी केले.

जी.एस्.टी.च्या अटींविरोधात व्यापारी संघटनांची आंदोलनाची चेतावणी

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण कायदा (एफ्.एस्.एस्.आय.) आणि जी.एस्.टी. कायद्यातील जाचक तरतुदी रहित कराव्यात, यासाठी देशभर आंदोलन करण्याचा निर्णय ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)’ च्या राज्यव्यापी परिषदेमध्ये घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याचे कार्यालय पेटवले 

अज्ञातांकडून मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याचे ऊस नोंदणी कार्यालय पेटवून दिले.

प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या अकोला आणि अमरावती महानगरपालिकांवर कारवाई कधी ? – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही कारवाई न करणार्‍या अकोला आणि अमरावती या महानगरपालिकांविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळ कधी कारवाई करणार ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला.

कोरोनाचे संकट असतांना नवरात्रोत्सवाचे मंडप घालू दिलेच कसे ? – उच्च न्यायालय

महापालिकेने कोरोनाच्या काळात अशा आयोजनाची अनुमती कशी दिली ?,-न्यायमूर्ती शाहरूख काथावाला

परभणी जिल्ह्यात ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव झाल्याने ८० सहस्र कोंबड्या मारण्यात येणार ! – सुनील केदार, पशूसंवर्धन मंत्री

शहरात ८०० कोंबड्यांचा ‘बर्ड फ्ल्यू’मुळे मृत्यू झाला आहे. यानंतर जिह्यातील ८० सहस्र कोंबड्या मारण्यात येणार आहे. राज्यातील ६ जिल्ह्यांना याचा धोका असणार आहे – राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार