साखरेच्या एफ्.आर्.पी. (हमीभाव) आंदोलनाचा भडका

सांगली – एकरकमी एफ्.आर्.पी.साठी (हमीभाव) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन चालू केले आहे. ११ जानेवारी या दिवशी अज्ञातांकडून मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याचे ऊस नोंदणी कार्यालय पेटवून दिले. या आगीत कार्यालयातील साहित्य, कागदपत्रे, पटल आणि आसंद्या जळून खाक झाले आहेत.
या संदर्भात अद्याप कोणत्याही शेतकरी संघटनेने याचे अधिकृत दायित्व स्वीकारलेले नाही. कोल्हापूरच्या धर्तीवर एकरकमी एफ्.आर्.पी. देण्याची स्वाभिमानीची मागणी सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी मान्यही केली होती; मात्र जिल्ह्यातील १६ पैकी केवळ ४ साखर कारखान्यांनी एकरकमी एफ्.आर्.पी. दिला आहे. अन्य कारखान्यांनी एकरकमी एफ्.आर्.पी. देण्यास आता असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा तीव्र आंदोलन छेडले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
महामंडळाच्या बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम !