शाकंभरी नवरात्रोत्सवात मोजके सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत होणार धार्मिक विधी
आठ दिवसांच्या मंचकी निद्रेनंतर २१ जानेवारीच्या पहाटे श्री तुळजाभवानीदेवी सिंहासनावर विराजमान होईल.
आठ दिवसांच्या मंचकी निद्रेनंतर २१ जानेवारीच्या पहाटे श्री तुळजाभवानीदेवी सिंहासनावर विराजमान होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप करून मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली होती; मात्र मुंडे यांनी या महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत.
लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरवण्यात आले असून पहिल्या गटात हेल्थ केअर वर्कर्सचा समावेश आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून नांदगाव, तळेरे, कासार्डे, कणकवली या ठिकाणच्या पुलांची कामे शिल्लक आहेत. ही कामे येत्या मासात मार्गी लागल्यानंतर दोन मासांत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लोकार्पणासाठी सज्ज होईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
या प्रकरणाची सरकारने तात्काळ नि:पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !
उपमहापौर राजेश काळे यांना भाजप पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. राजेश काळे यांच्यावर महापालिका आयुक्त आणि उपायुक्त यांना खंडणीसाठी धमकावणे, शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, असे आरोप उपायुक्त धनराज पांडे यांनी दिलेल्या तक्रारीत करण्यात आले होेते.
येथील ‘यशस्विनी ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्याप पसार असून त्याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. तरीही तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. यामुळे तपास रेंगाळला असून संशयाला वाव मिळत आहे.
सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथून सकाळी ६ वाजता सुटणारी साटेली, कोंडुरे, आरोस बाजार, रोणापाल, मडुरा, शेर्ला ते बांदा ही बसगाडी शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या तसेच गोरगरीब कामगार, छोटे-मोठे भाजी विक्रेते यांच्यासाठी चालू होती.
१२ गावांतील गावकर्यांनी वारंवार मागणी करूनही स्वतंत्र ग्रामपंचायत सिद्ध न करणे हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे.
या सोहळ्यानिमित्त सम्मती कट्टा परिसर फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. या वेळी पालखीचे पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा या वर्षी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आणि शासनाच्या नियमांचे पालन करत पार पडला.