
पुणे – समर्थांच्या वेळची परिस्थिती आक्रमणाची होती. लढाई हा धर्माच्या संरक्षणाचा केवळ एक भाग आहे; मात्र केवळ लढाई म्हणजे धर्माचे संरक्षण नव्हे. प्रतिकार, प्रबोधन, संशोधन आणि आचरण हेही धर्माचे संरक्षण आहे. हे सर्व श्रीरामाने केले. समाजाला दिशा दाखवण्यासाठी आदर्श राजधर्माचे पालन करणे आवश्यक होते. प्रभु श्रीरामानंतर श्री समर्थांनी आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना समोर ठेवले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प. पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

श्रीसमर्थवाग्देवता मंदिर, धुळे या संस्थेच्या वतीने ‘श्रीसमर्थ रामदासस्वामी लिखित वाल्मिकी रामायण’ या ग्रंथाच्या मूळ सात बाडांचे कांडशः संपादन करून बनवण्यात आलेल्या ८ खंडांचे राष्ट्रार्पण सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या ८ खंडांमध्ये मूळ हस्तलिखितांसमवेत मराठी आणि इंग्रजीत त्याचा अनुवाद मांडण्यात आला आहे.

या वेळी व्यासपीठावर श्रुतिसागर आश्रम, फुलगांव येथील प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती, श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगडचे बाळासाहेब स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !