‘वक्फ बोर्डा’चा ‘लँड’ (भूमी) जिहाद !

धुळे – शहरातील नटराज टॉकीज परिसरातील दत्तवाडी, पारोळा रोड, मनमाड जीन, काजी प्लॉट, नित्यानंदनगर, लक्ष्मीनगर आणि लोकमान्यनगर या परिसरात ३ सहस्र ३०० हिंदु कुटुंबे गेल्या ६० वर्षांपासून वास्तव्य करत आहेत. तेथील भूमी काजी यांच्याकडून ९९ वर्षे करारावर घेण्यात आली होती. याची मर्यादा वर्ष २०६६ पर्यंत आहे; मात्र या जागेवर आता ‘वक्फ बोर्डा’ने हक्क सांगितला आहे. वक्फ बोर्डाच्या या दाव्यामुळे या भागातील रहिवाशांना खरेदी विक्री, बँक, तसेच महानगरपालिका या विभागातील कोणत्याही प्रकारचा ‘ना हरकत दाखला’ मिळत नाही.
सौजन्य नागपूर समय मीडिया
‘वक्फ बोर्ड हटाव संघर्ष समिती’च्या आंदोलनात वक्फ कायदा रहित करण्याची मागणी !
अन्य एका प्रकरणात मुसलमानांनी जिल्ह्यातील लळींग गावालगत असलेल्या टेकडीवर दर्गा उभारून ती संपूर्ण टेकडी वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित केली आहे. या विरोधात ‘वक्फ बोर्ड हटाव संघर्ष समिती’च्या वतीने जेलरोड परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी वक्फ कायदा तात्काळ रहित करण्याविषयी जिल्हाधिकार्यांना निवेदनही देण्यात आले.
‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जगातील मुसलमान देशांत हा कायदा नसून केवळ भारतातच तो का ?’, असा प्रश्न या रहिवाशांनी विचारला आहे. या आंदोलनात खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्वे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
संपादकीय भूमिका
|
चिपळूणच्या गोवळकोट धक्का येथे पावसाळापूर्व ‘मॉक ड्रिल’ : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता !
लोटे (खेड) येथील औद्योगिक वसाहत आणि परिसरातील गावांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
गडचिरोलीमधील लोहखनिज खाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
येत्या १५ दिवसांत येणार ‘माझा फ्लॅट’ योजना ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री