
मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे; मात्र नवीन सरकारने अद्याप बहुमत सिद्ध केलेले नाही. हे बहुमत सिद्ध करण्यासाठी ४ जुलै या दिवशी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मतदान होणार आहे.
विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे उमेदवार अधिवक्ता राहुल नार्वेकर हे बहुमताने निवडून आले. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक ते बहुमत भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार सहजपणे पूर्ण करेल, अशी सध्याची स्थिती आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !