
नवी देहली – ‘मेक इन इंडिया’च्या पुढाकारानंतर भारताने शस्त्रास्त्रांची आयात अल्प करण्यावर भर दिला आहे. वर्ष २०११ ते २०१५ आणि वर्ष २०१६ ते २०२० यांची तुलना केली, तर देशाची शस्त्र आयात ३३ टक्क्यांनी घटली आहे. याचा सर्वाधिक फटका रशियाला बसला आहे; कारण भारत रशियाचा शस्त्र खरेदीसाठीचा मोठा ग्राहक आहे. तसेच अमेरिकेसमवेतची शस्त्र आयात ४६ टक्क्यांनी अल्प केली आहे. दुसरीकडे आशिया खंडात शस्त्रांंची सर्वाधिक आयात करणार्या देशांमध्ये पाकिस्तानचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्युटच्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे.
वर्ष २०१६ ते २०२० या ४ वर्षांमध्ये चीनकडून होणार्या शस्त्र निर्यातीत ७.८० टक्के घट झाल्याचेही अहवालातून समोर आले आहे. शस्त्रांंच्या निर्यातीत चीन जगात ५ व्या क्रमांवर आहे. पाकिस्तान सर्वाधिक चिनी शस्त्रांवर अवलंबून आहे.
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan
US Indians Deportation : अमेरिका १८ सहस्र भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढणार !
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !