हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील धर्मप्रेमींचा कृतीशील होण्याचा निर्धार !

यवतमाळ, १८ डिसेंबर (वार्ता.) – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ७३ वर्षांत हिंदूंच्या समस्या सुटलेल्या नाहीत. हिंदूंना धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले गेले. ८ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक झाले आहे. ‘धर्मनिरपेक्ष’ या गोंडस नावाखाली हिंदूंवर आघात होत आहेत. त्यामुळे १०० कोटी हिंदू असलेल्या भारताला संवैधानिकदृष्ट्या ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली. ते ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची मूलभूत संकल्पना’ याविषयी १३ डिसेंबर या दिवशी जिल्ह्यामध्ये पार पडलेल्या ‘ऑनलाईन’ बैठकीत बोलत होते.

या वेळी सनातन संस्थेच्या सौ. सुनंदा हरणे यांनी ‘धर्मसंस्थापनेच्या कार्यात साधनेचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन केले. शिबिरातील विषय ऐकल्यानंतर सहभागी धर्मप्रेमींनी ‘नववर्ष १ जानेवारीऐवजी गुढीपाडव्याला साजरे करणार, कपाळाला टिळा लावणार, धर्मकार्यासाठी वेळ देणार, मंदिरात नियमित दर्शन घेऊन प्रार्थना करणार, फोनवरून ‘हॅलो’ऐवजी ‘नमस्कार’ किंवा ‘जय श्रीराम’ म्हणणार’, असा कृतीशील होण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !