साधकांची प्रज्ञा जागृत करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !


शारदेच्या कृपाप्रसादे ।
पदबंधांत लाघव यावे ।
प.पू. माऊलींच्या चरणी ।
काव्यपुष्प अर्पण व्हावे ॥ १ ॥
भावनांत बहु रंगलो ।
भावसरींत चिंब भिजलो ।
हरिभजनाविण काळ न जावा ।
मनाचे मंदिर बनावे ॥ २ ॥
कलंक मतीचा झडो लवकरी ।
संतवचनांच्या आश्रयास जावे ।
पामरास या इतुकेच ठावे ।
गुरुचरणांना नित्य स्मरावे ॥ ३ ॥
माऊली तुझे विश्वरूप ।
डोळ्यांत कसे साठवावे ।
अद्वैताचे मज भान येऊनी ।
चराचरात तुला पहावे ॥ ४ ॥
त्वमेव माता हेच आता ।
जीवनाचे मम ब्रीद ठरावे ।
पंचप्राणांच्या आरतीने ।
माऊली तुज ओवाळावे ॥ ५ ॥
(‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विष्णुतत्त्व जागृती सोहळा’ पाहिल्यानंतर साधकाला स्फुरलेले काव्य)
– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, बांदोडा, गोवा. (११.१२.२०१९)
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !