असामान्य कर्तृत्वाचे स्वामी विवेकानंद !
आज, १४ जानेवारी २०२३ स्वामी विवेकानंद यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
आज, १४ जानेवारी २०२३ स्वामी विवेकानंद यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ या दिवशी झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनावर रामायण महाभारताचे संस्कार करण्यात आले. कुशाग्र बुद्धीच्या नरेंद्रने अनेक गोष्टी सहजतेने आत्मसात केल्या.
पावित्र्याचा सतीचा महिमा सांगणार्या काही अद्भुत परमोदात्त सती-कथा गुरुचरित्रात आहेत. सतीची महती अबाधित आहे. अविच्छिन्न आहे, म्हणजेच गुरुचरित्राची गुरुता (गरिमा) ही चिरंतन आणि शाश्वत आहे.
स्वामी विवेकानंद यांनी जो संदेश दिला होता, तो आजही लागू आहे. आज भारताला विश्वगुरु होण्याची चांगली संधी आहे. विश्वबंधुत्वाची कल्पना चांगली आहे. भारत ही जगातील सर्वांत प्रगती करणारी अर्थव्यवस्था आहे. या गोष्टींचा लाभ घेऊन आपण जगाला आपल्या शक्तीचा परिचय करून दिला पाहिजे.
आपल्याला केवळ शक्तीचीच आवश्यकता असून प्रत्येक क्षणी ‘शक्ती’, ‘शक्ती’, असाच ध्यास हवा ! उपनिषदे म्हणजे प्रचंड शक्तीसंचय असलेली मोठी खाण आहे. ही उपनिषदेच हाती तुतारी घेऊन सार्या दुर्बल जनांना, दुःखी, कष्टी आणि विविध स्तरांवरील लोकांना सांगतील की, तुम्ही तुमच्या पायावर उभे रहायला शिका आणि मुक्त व्हा !
भारतमातेवर केवळ प्रेमच पुरेसे नाही, आता तर मी तिला नमस्कार करीन; कारण भारतातील सनातन धर्माच्या जीवनपद्धतीत मुक्ती आहे. नम्रता, सहजता आणि सज्जनता आहे. परोपकारिता ठासून भरलेली आहे आणि तेथील लोक सर्वकाही करूनही ‘ईश्वरच करतो’, अशा विचाराचे धनी आहेत.
हिंदूंनी धर्म सोडला की, हिंदूंच्या जीवनाचा कणाच मोडला म्हणून समजा. ज्या पायावर या धर्माचा सुविशाल प्रासाद उभारला गेला आहे, तोच भग्न झाला, असे समजा. याचा परिणाम ठरलेलाच आहे आणि तो म्हणजे ‘सर्वांगीण विध्वंस !’
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा लेखकाने काढलेला मतितार्थ योग्य वाटतो का ?
हिंदु संतांविषयीचे अवमानकारक लिखाण रोखण्यासाठी सरकारने ईशनिंदा विरोधी कायदा करणे आवश्यक !
‘पाश्चात्त्य देशात येण्यापूर्वी मी भारतभूमीवर प्रेम करत होतो. आता मात्र भारतभूमीवरील धुळीचा कणही मला पवित्र आहे. भारत माझ्या दृष्टीने तीर्थभूमी झाली आहे.’