
बहुतांच्या हितासाठी आणि बहुतांच्या सुखासाठी निःस्वार्थ भावाने अन् भक्तीपूर्ण हृदयाने समस्त सहृदय, तसेच स्वदेशप्रेमी विद्वज्जनांना या आधुनिक भारताच्या सर्व प्रश्नांची चर्चा करून ते सोडवण्यासाठी आवाहन करत आहे. कुणाहीविषयी यत्किंचितही द्वेष न बाळगता आणि कुणाही व्यक्तीसंबंधी, समाजासंबंधी वा सांप्रदायासंबंधी कदापि कटू शब्द न वापरता सर्वच संप्रदाय, पंथ यांच्या अन् सर्वच वर्गांच्या सेवेसाठी ‘उद्बोधन’ करून स्वतःला समर्पित करा. आपला अधिकार कर्म करण्याचा फळ देणे प्रभूच्या हाती ! आमची त्याला केवळ एवढीच प्रार्थना आहे, ‘हे प्रभो, तू ओजस्वरूप आहेस, आम्हाला ओजस्वी कर. तू वीर्यस्वरूप आहेस, आम्हाला वीर्यवान कर. तू बलस्वरूप आहेस, आम्हाला बलवान कर.’ – स्वामी विवेकानंद
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
नामजपाचे महत्त्व !
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !