स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सनातन धर्मियांनी रणनीती आखणे आवश्यक ! – रघुनंदन शर्मा, माजी राज्यसभा खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष, भारत रक्षा मंच
आज भारतात हिंदु धर्माला राज्यघटनेत कोणतेही विशेष संरक्षण उपलब्ध नाही. भारत हिंदु राष्ट्र असतांनाही राज्यघटनेत त्याला ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) घोषित करण्यात आले, हा हिंदु समाजावर मोठा अन्याय आहे. या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंना प्रवृत्त करणे, हीच काळाची आवश्यकता आहे.