ठाणे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात, २ जण घायाळ !

बस आणि कंटेनर यांची धडक झाल्याने वाहक बसलेल्या बसच्या दर्शनी भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या वेळी बसमध्ये ९ प्रवासी होते. त्यामधील बस वाहक अमर परब आणि प्रवासी महिला गीता कदम हे दोघे घायाळ झाले आहेत.

गोव्यात ५० इंच पावसाचा टप्पा पार : जनजीवन विस्कळीत

राज्यात दरड कोसळणे, झाडे पडणे, घर आणि इतर संसाधने यांची हानी होणे असे प्रकार चालूच आहे. राज्यातील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली आहेत. हवामान खात्याने पुढील ६ दिवस काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची (ऑरेंज अलर्ट) चेतावणी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी

या पावसामुळे वीजवितरण यंत्रणा काही ठिकाणी कोलमडली आहे, तसेच झाडांच्या पडझडीमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी घरे, गोठे यांसह वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत.

बसचालक शेख दानिश मद्यधुंद अवस्‍थेत असल्‍याने अपघात घडल्‍याची शक्‍यता !

प्रादेशिक परिवहन विभागाने टायर फुटल्‍यामुळे अपघात झाला का ?’, याचे अन्‍वेषण केले. त्‍यासाठी टायरच्‍या खुणा आणि नमुनेही पडताळण्‍यात आले; पण रस्‍त्‍यावर टायर फुटल्‍याच्‍या कोणत्‍याही खुणा आढळल्‍या नाहीत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

जिल्ह्यात गेले २ दिवस मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच काही ठिकाणी वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

गोवा राज्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी चालूच : जनजीवन विस्कळीत

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रीय वारे, तसेच अल्प दाबाचा पट्टा यांमुळे राज्यात ५ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे. हवामान खात्याने आजही येलो अलर्टची, तर पुढील ४ दिवस काही ठिकाणी ऑरेंज अलर्टची चेतावणी दिली आहे.

गोव्यात अतीवृष्टीमुळे आज शैक्षणिक सुट्टी

राज्यात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाणे, सखल भागात पाणी साचणे, रस्त्याच्या बाजूची माती खचणे, पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहने गटारात जाणे, झाडांची पडझड होणे, घरांच्या भिंती पडणे आदी घटना घडल्या आहेत. सलग आठव्या दिवशी मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत !

ओडिशातील बालासोर रेल्वे अपघात सदोष सिग्नल यंत्रणेमुळेच ! – रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा अहवाल

सदोष सिग्नल यंत्रणेला उत्तरदायी असणार्‍या अधिकार्‍यांना शेकडो प्रवाशांचा बळी घेतल्यासाठी उत्तरदायी ठरवून तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

अपघातग्रस्‍त बसच्‍या विदर्भ ट्रॅव्‍हल्‍सवर आतापर्यंत अनेक नियमांचे उल्लंघन प्रकरणी दंड

संबंधित बस आस्‍थापनाने अनेक वेळेला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी त्‍यांना दंड झाला आहे; मात्र कधीही तो दंड भरलेला नाही. अपघात झाल्‍यानंतर मात्र अवघ्‍या काही घंट्यांत सर्व दंड ‘ऑनलाईन’ भरण्‍यात आले.

बसचालक दानिश शेख इस्माईल याच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

२५ जणांचे बळी घेऊनही खोटे बोलणार्‍या दानिश इस्लामईलची मनोवृत्ती जाणा ! मनुष्यवधाच्या प्रकरणी दानिश याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी !