ओडिशात पुलावरून बस कोसळल्याने ५ जण ठार, तर ४० जण घायाळ

भुवनेश्‍वर (ओडिशा) – ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-१६ वरील बाराबती पुलावरून बस कोसळल्याने झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले. ही बस पुरी येथून कोलकाता येथे जात होती.

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३ लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

सौजन्य The Economic Times