नवाब मलिक हे आमचे जुने सहकारी ! – सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मधील कालावधीमध्ये झालेल्या घडामोडींशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते विधानसभेचे सदस्य आहेत.

नवाब मलिक सत्तेत सहभागी होण्याची शक्यता !

मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील आरोपीशी हातमिळवणी करून मुंबईतील गोवावाला कंपाऊंड येथील ३ एकर भूमी हडप केल्याच्या आरोपावरून अटक झालेले आणि सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक विधानसभेत अजित पवार गटातील सदस्यांसमवेत बसले होते.

काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांनी घेतली तेलंगाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ !

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला पराभूत करून काँग्रेसला सत्तेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारेे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाले आहेत.

तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना घरचा अहेर : तेलंगाणात मोठा फटका !

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा पालट दिसून आला. तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना जनतेने घरचा अहेर दिला.

मिझोराममध्ये ‘झोराम पीपल्स मूव्हमेंट’ पक्षाला बहुमत

४० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेड.पी.एम्.) या पक्षाला २९ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (एम्.एन्.एफ्.) या पक्षाला ७ जागांवर आघाडी मिळाली आहे.

संपादकीय : निकालाचा मतीतार्थ !

चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या दिशेने पडलेले आणखी एक पाऊल आहे. २ राज्यांमध्ये जनतेने झिडकारल्याने सत्ता गमावणारी काँग्रेस या पराभवानंतर आत्मपरीक्षण करील का ? या निकालांद्वारे सामान्य लोकांनी त्यांना काय हवे आहे’, याविषयी मतपेटीद्वारे संदेश दिला आहे.

वर्ष २०२४ मध्ये भाजप हॅटट्रिक करील ! – भाजपचे माजी आमदार बाळ माने

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांची विधानसभेची उपांत्य फेरी जिंकत भाजपने बाजी मारली आहे. आता लोकसभा महाविजय २०२४ ची अंतिम फेरी नक्कीच जिंकून भाजप हॅटट्रिक करील आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी शपथ घेतील.

राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव !

४ पैकी ३ राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपचा विजय
मध्यप्रदेशात भाजपने सत्ता राखली !
तेलंगाणामध्ये काँग्रेसचा विजय

‘जायकवाडी’ धरणासाठी सोडलेले पाणी नाशिककरांनी रोखले !

जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा धरण समुहातून पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील जायकवाडी धरणात सोडण्यात आलेले ४०० दशलक्ष घनफूट पाणी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी रोखले आहे.

सांगली येथे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत टिपू सुलतानच्या चित्राला हार घातला !

टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे आंबेडकर ‘धर्मांधांच्या दृष्टीने हिंदु हे काफीरच असतात’, हे लक्षात घेतील का ?