Congress on LS Polls : नरेंद्र मोदी यांनी नैतिक दायित्व स्वीकारून त्यागपत्र द्यावे ! – जयराम रमेश, काँग्रेस

नवी देहली – लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट प्रसारित करत नरेंद्र मोदी यांनी नैतिक दायित्व स्वीकारून पंतप्रधानपदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी केली आहे.

भारतीय जनता पक्षाने या लोकसभा निवडणुकीत ४०० पारची घोषणा दिली होती; मात्र सध्या समोर आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी २९० जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसप्रणीत ‘इंडी’ आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे.