तापाच्या रुग्णांना केवळ ‘डोलो’ औषध देण्यासाठी आस्थापनाने डॉक्टरांना वाटल्या १ सहस्र कोटी रुपयांच्या भेटवस्तू !

न्यायालयाने अशा प्रकारे लाच देणार्‍या आस्थापनांना कठोर शिक्षा करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील रुग्णालयाला लागेल्या भीषण आगीत ८ जण मृत्यूमुखी

मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी ५ रुग्ण आणि रुग्णालयाचे ३ कर्मचारी यांचा समावेश आहे, तर १२ हून अधिक जण यामध्ये घायाळ झाले आहेत.

‘ओव्हरटेक’ करतांना एस्.टी. बस नर्मदा नदीत कोसळली !

या घटनेत चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अपघातात १० प्रवासी, एस्.टी. चालक आणि वाहक यांचा मृत्यू झाला होता.

ठाणे जिल्ह्यात ‘स्वाईन फ्ल्यू’च्या रुग्णसंख्येत वाढ; तिघांचा मृत्यू !

ठाणे जिल्ह्यातील ६ महानगरपलिका, २ नगरपालिका आणि ग्रामीण भागात आतापर्यंत १ लाख १७ सहस्र ५९० संशयितांची चाचणी करण्यात आली. यामध्ये ३४ जणांच्या चाचणीचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत.

अमेरिकेमध्ये डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे नवे संकट !

वर्ष २०३३ पर्यंत अमेरिकेत ५४ सहस्र १०० ते १ लाख ३९ सहस्र डॉक्टरांचा तुटवडा भासू शकेल. हा तुटवडा प्राथमिक, तसेच गंभीर उपचार पद्धतींच्या विभागातही भासवू लागला आहे.

राज्यात १७३ जणांना ‘स्वाईन फ्ल्यू’ची लागण !

राज्यात ‘स्वाईन फ्ल्यू’चा (विशिष्ट विषाणूंमुळे येणारा ताप) धोका वाढत आहे. पावसाळा चालू झाल्यापासून या तापाचे रुग्ण वाढले आहेत.

राज्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत पुणे जिल्हा अग्रस्थानी !

डेंग्यूच्या रुग्णसंख्येत राज्यात पुणे जिल्हा अग्रस्थानी आहे. जूनअखेर राज्यात डेंग्यूचे १ सहस्र १४६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३०५ रुग्ण पुण्यातील आहेत. ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.

देशभरात सध्या १ लाख ३० सहस्र ५८९ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग !

देशात सर्वाधिक मृत्यू केरळ राज्यामध्ये झाले आहेत. गेल्या २४ घंट्यांत १७ जण कोरोनाला बळी पडले आहेत.

मेळघाटातील (जिल्हा अमरावती) पाचडोंगरीत दूषित पाण्यामुळे दोघांचा मृत्यू; ७४ जणांवर उपचार चालू !

चिखलदरा तालुक्यातील पाच डोंगरी येथे दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या आजारामुळे एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे.

जगातील ११० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला ! – जागतिक आरोग्य संघटना

भारतात एका दिवसात १८ सहस्रांहून अधिक नवे कोरोना रुग्ण !